शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि निविष्ठा पोहोचणार पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते वरखेडला शुभारंभ
अमरावती, दि. 11 : कोविड 19 मुळे दक्षता म्हणून व गर्दी टाळण्यासाठी शेतकरी बांधवांच्या बांधावर खते, बियाणे शेतकरी गटामार्फत वितरण व्यवस्था बाबत शासनाच्या सूचना आहेत.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत तिवसा मतदारसंघांसह अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे वितरण कार्यक्रम शुभारंभ वरखेड येथे पार पडला.
याआधी सारशी गायीची येथे प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग करण्यात आला होता. आज शेंदूरजना बाजार, वणी, ममदापुर , वरखेड, तारखेड या गावासाठी या खते बियाणे च्या गाड्याना हिरवी झेंडी दाखवून पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी शुभारंभ केला.
यावेळी जि प सभापती पूजा आमले, प स सभापती शिल्पा हांडे, नगराध्यक्ष वैभव स वानखडे, उपसभापती शरद वानखडे, प स सदस्य कल्पना दिवे, प स सदस्य रोशनी पुनसे, प स सदस्य अब्दुल सत्तार, दिलीपराव बोके, प्रदीप बोके, सुभाषराव पाचघरे, परीक्षित बोके, अमित इंगळे, चंद्रशेखर कडू, राजाभाऊ देशमुख, जीवन देशमुख, घनश्याम भोयर, बाळूभाऊ बोके, अनिल बोके, वैभव बोके, सागर भवते, बाळू हरणे,रुपराव बोके, मधुभाऊ मेश्राम, मनोहर अमदरे, राजू कांडलकर, तहसीलदार वैभव फरतारे, कृषि अधिकारी अनिल कांबळे, प स कृषी अधिकारी गावंडे व महसूल व कृषि विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment