Tuesday, October 16, 2018

'जय महाराष्ट्र' मध्ये गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता


 मुंबईदि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात राज्यातील कायदा व सुव्यवस्था’ या  विषयावर गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. श्रीमती अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
             राज्यात सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे नियोजनअफवांना बळी पडून होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर नियंत्रणासाठी पोलीस विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनासोशल मीडियावर अफवा पसरविणा-यांवर करण्यात येणारी कारवाईराज्यातील महिलाबालके आणि वृध्दांच्या सुरक्षिततेसाठी गृह विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनासामाजिक ऐक्य व शांतता राखण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच गावस्तरावर केले जाणारे प्रयत्नट्रान्सफॅार्म महाराष्ट्र  संकल्पना याबाबतची माहिती श्री. गुप्ता यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...