'जय महाराष्ट्र' मध्ये गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता
मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ‘राज्यातील कायदा व सुव्यवस्था’ या विषयावर गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. श्रीमती अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे नियोजन, अफवांना बळी पडून होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर नियंत्रणासाठी पोलीस विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, सोशल मीडियावर अफवा पसरविणा-यांवर करण्यात येणारी कारवाई, राज्यातील महिला, बालके आणि वृध्दांच्या सुरक्षिततेसाठी गृह विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, सामाजिक ऐक्य व शांतता राखण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच गावस्तरावर केले जाणारे प्रयत्न, ट्रान्सफॅार्म महाराष्ट्र संकल्पना याबाबतची माहिती श्री. गुप्ता यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
Comments
Post a Comment