Wednesday, October 24, 2018

नरभक्षक वाघाबाबत पालकमंत्र्यांकडून वनमंत्र्यांना पत्र नागरिकांना शांततेचे आवाहन



          अमरावती,दि 24 : - अमरावती जिल्हृयातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीरचे रहिवासी शेतकरी राजेंद्र निमकर यांना आणि अंजनसिंगी येथील शेतमजूर मोरेश्वर वाळके हे नरभक्षक वाघाने केलेल्या  हल्ल्यात ठार झाले.संपूर्ण परिसर नरभक्षक वाघाच्या दहशतीखाली असून या वाघाच्या बंदोबस्तासाठी तातडीने कार्यवाहीसाठी जिल्हृयाचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. त्याचप्रमाणे, हल्ल्यात बळी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
          पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी ही गंभीर परिस्थिती वनमंत्र्यांना पत्र देऊन अवगत करुन दिली व नरभक्षक वाघास जेरबंद करण्यासाठी तातडीने उपाययोजनेची  मागणी केली आहे.
          या वाघाने आतापर्यंत अनेक पाळीव प्राणी व जनावरेही फस्त्‍ केली आहेत. नरभक्षक वाघाच्या हल्ल्याच्या  भितीपोटी शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नसून धामनगाव व तिवसा तालुक्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे तात्काळ ही समस्या सोडविण्या

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...