वनविभाग भरती परीक्षेबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वन विभागाचे आवाहन
वनविभाग भरती परीक्षेबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा;
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वन विभागाचे आवाहन
+
अमरावती, दि. 30 - वन विभागामार्फत भरती प्रक्रिया दि. 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान विविध परिक्षा केंद्रावर लेखी परिक्षाचे आयोजन करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेतील वनरक्षक पदाच्या परिक्षेसाठी पेपर लिक करुन खाजगी केंद्रामध्ये ज्याची परिक्षा आहे, त्यांना पेपरमध्ये मदत करण्यासंदर्भातील संदेश विविध समाज माध्यमांवर प्रसारीत होत आहे.
खात्याकडून घेण्यात येत असलेली परिक्षा ही टीसीएस यांचे माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. त्यामुळे समाज माध्यमावर प्रसारीत होत असलेले संदेश आणि अफवांवर परिक्षार्थींने/नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन अमरावती वन विभागाचे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांनी केले आहे.
प्रसारित होत असलेल्या संदेशासंदर्भात पोलीस विभागाकडे तक्रार करण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील परिक्षार्थींना कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास पुराव्यानिशा या कार्यालयाकडे किंवा पोलिस विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन वन विभागाव्दारे करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment