अधिकृत कंपणीमार्फतच आरोग्य मित्राची नियुक्ती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

अधिकृत कंपणीमार्फतच आरोग्य मित्राची नियुक्ती;

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

अमरावती, दि.22 (जिमाका):  महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी आरोग्यमित्रांची नियुक्त करण्यात आली आहेत. काही संस्थाव्दारे आरोग्यमित्र नियुक्तीसंदर्भात जाहिराती व्हायरल होत आहे. अशा अफवा व भाम्रक जाहिरातीवर तरुणांनी विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रधान मंत्री जन आरोग्य योजनाचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे यांनी केले आहे. आरोग्य मित्रांची नियुक्ती अधिकृती संस्थेकडून केली जात असून नियुक्ती संदर्भात कोणतेही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना 2012 पासून तर केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018 पासून राज्यात राबविली जात आहे. तसेच 1 एप्रिल 2020 पासून दोन्ही योजना एकत्रित कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनाची माहिती व मार्गदर्शनासाठी तसेच प्रणालीवर रुग्णांचे कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी आरोग्यमित्र नियुक्त केले जातात. आरोग्यमित्रांची नियुक्ती इन्शुरन्स कंपनीच्या थर्ड पार्टी एडमिनिस्ट्रेटरव्दारे कार्यरत एम.डी. इंडिया, मेडीअसिस्ट, प्यारा माऊंट व हेल्थ इन्शुरन्स या चार कंपन्या व्दारे केली जातात.

 

मागील काही दिवसांपासून विविध यंत्रणा व संस्थांद्वारे आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेकरीता आरोग्यमित्र नियुक्ती देण्यासंदर्भात जाहिराती व संदेश व्हायरल होत आहे. सुशिक्षित तरुण, तरुणींनी या अफवेवर विश्वास ठेवू नये. अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात कंपणीकडून प्रसिद्ध झाली नसून अशा अफवा, भ्रामक जाहिरातीला बळी पडू नये. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी निशुल्क दूरध्वनी क्रमांक 155388 किंवा  18002332200 वर संपर्क साधावा, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती