सुधा नरवणे यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली


मुंबईदि24आकाशवाणीच्या प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या भावविश्वात एक अनोखे स्थान असणारा आवाज हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्रीमती नरवणे  आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निवेदनशैलीसाठी प्रसिद्ध होत्या. भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. याबरोबरच त्यांचे साहित्यातील योगदानही लक्षणीय होते. विशेषतः त्यांच्या लघुकथा या वाचकप्रिय होत्या. त्यांच्या निधनाने आकाशवाणीला सर्वसामान्यांशी जोडणारा एक दुवा निखळला आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती