खातरजमा केल्याशिवाय तरुणांनी समाज माध्यमांवर पोस्ट करु नये - ब्रिजेश सिंह


नागपूर, दि. 17 : फेसबुक, व्हाटसअॅप ही समाज माध्यमे आज जागतिक राजकारण बदलत आहेत. समाजमाध्यमांकडून आलेल्या पोस्टची कोणतीही खातरजमा न करता आपण ती पुढे पाठवित असतो. अशा अफवा पसरविणाऱ्या पोस्टमुळे समाजातील वातावरण बिघडते. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी समाज माध्यमांवरील पोस्ट दुसरीकडे पाठविताना (फॉरवर्ड) सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून त्याची खातरजमा करावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित संसदीय लोकशाही पुढे नक्षलवादी चळवळीचे आव्हान आणि अफवांचे पीक, व्यवस्थेला धोका या विषयावरील परिसंवाद श्री. सिंह बोलत होते. यावेळी नागपूर शहराचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी नक्षलवादी चळवळीची माहिती दिली.
समाज माध्यमांमध्ये फिरणाऱ्या अफवांचे वास्तव विशद करून श्री. सिंह म्हणाले, समाज माध्यमे येण्यापूर्वी अफवा पसरविण्यासाठी व्यक्तिचा थेट सहभाग असायचा व त्यासाठी वेळ लागत असते. मात्र आता तंत्रज्ञानामुळे व सहज उपलब्ध असणाऱ्या समाज माध्यमांमुळे (सोशल मीडिया) काही क्षणात अफवा पसरविता येतात. आज कोणतीही खातरजमा न करता व्हाटसअपवर आलेली पोस्ट पुढे पाठविली जाते. समाजातील महापुरुष, जाती, धर्म, शासनविरुद्धची खोटी माहिती आदी पोस्टची खातरजमा न करता फॉरवर्ड करणे घातक होते. पारंपरिक माध्यमे ही प्रत्येक माहितीची खातरजमा करूनच ती प्रसिद्ध करत असतात. परंतु समाज माध्यमांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे खातरजमा होत नाही. एखाद्या पोस्टबद्दल तक्रार करण्याची सुविधा फेसबुकमध्ये असली तरी व्हाटसअपवर ती सोय नाही. अफवा पसरण्यापासून रोखणे ही आपली जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे तरुणांनी कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी ती घटना, पोस्ट खरी आहे का याची खातरजमा करावी. त्यासाठी पोलीसांची मदत घ्यावी.
समाज माध्यमांचा धोका ओळखून चीनने फेसबुक, व्हॉटस्अॅप आदी बाहेरील समाज माध्यमांवर देशात बंदी घातली आहे. त्याऐवजी ते स्वतः तयार केलेल्या संपूर्ण सुरक्षित अशा माध्यमांचा वापर करतात. ट्विटरवरील अनेक अकाउंट हे बाहेरच्या देशातून चालविले जातात. त्याच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचे त्यांना हवे तसेच वातावरण तयार केले जाते. समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांचा संपूर्ण डेटा त्या कंपन्यांकडे उपलब्ध असल्यामुळे वापरकर्त्याच्या प्रत्येक हालचालींची माहिती कंपन्यांकडे असते. त्यामुळे वापरकर्त्याच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होतो. तरुणांनी याबाबत दक्ष असायला हवे, असेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले. 
शहरी भागातील नक्षलवादी चळवळीचा धोका या विषयावर श्री. बोडखे यांनी विश्लेषणात्मक माहिती दिली. ते म्हणाले, जंगली भागात सुरू झालेली नक्षलवादी चळवळ ही आता शहरांमध्येही पसरत आहे. देशातील 21 राज्यात नक्षल चळवळ असून त्यातील 14 राज्यात ते सक्रिय आहे. देशातील सिलिगुडी ते केरळ अशा सर्वच भागात सक्रिय आहेत. राज्यातील गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील जंगलांमध्ये नक्षलवादी चळवळ मोठ्या प्रमाणात दिसून येते. पोलीसांच्या विशेष पथकांनी गोंदियामधील चळवळीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळविले आहे.
शहरांमधील कामगार, असंघटित क्षेत्रातील मजूर, वंचित घटक यांना एकत्र करून त्यांच्यामार्फत नक्षली कार्यवाही करण्याचे धोरण नक्षलवादी चळवळींने गेल्या काही वर्षांपासून सुरू केले आहे. कामगार संघटनांमध्येही या चळवळींने श
...

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती