महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर म.जी.प्रा. थकबाकीदार ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर

म.जी.प्रा. थकबाकीदार ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन

            अमरावती, दि.9: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांसाठी पाणी पट्टीच्या मुळ मुद्यलावरील विलंब आकार माफीच्या सवलीतीची अभय योजना 21 जानेवारी 2022 पासुन जाहीर झाली आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नुकतीच घोषणा केली असुन त्यानुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी 21 जानेवारी 2022 रोजी अभय योजने संदर्भात परिपत्रक काढले आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व थकबाकीदार ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या उपविभागात अर्ज करून आपले नाव समाविष्ट करावे, असे आवाहन म.जी.प्रा. प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता संतोष गव्हाणकर तसेच अधिक्षक अभियंता विवेक सोळंके यांनी केले आहे.

 

            पाणीपट्टी थकबाकी व त्यावरील ‍विलंब आकार यासाठी अभय योजना लागु करण्यात आली असून ही योजना दि.21 जानेवारी 2022 ते 20 जानेवारी 2023 पर्यंत फक्त एका वर्षाच्या कालावधीकरीता मर्यादीत आहे. ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विलंब आकार सवलतिची अभय योजना लागु करण्याच्या दिलेल्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. माफीची टक्केवारी चार भागात विभागली असून ग्राहकांना आता मुळ मुद्यल भरावयाची आहे. पहिल्या तिमाहीत म्हणजेच दि.21 जानेवारी 2022 ते 20 एप्रिल 2022 पर्यंत थकबाकीची पुर्ण रक्कम भरल्यास विलंब आकाराची टक्केवारी 100 टक्के आहे. दुसऱ्या तिमाहीत दि.21 एप्रिल 2022 ते 20 जुलै 2022 पर्यंत पुर्ण थकबाकी भरल्यास 90 टक्के, तिसऱ्या तिमाहीत दि.21 जुलै 2022 ते 20 जुलै 2022 पर्यंत 80 तर चौथ्या तिमाहीत दि. 21 ऑक्टोबर 2022 ते 20 जानेवारी 2023 पर्यंत 70 टक्के सुट मिळणार आहे. एकदा या योजनेत प्रविष्ठ झाल्यावर या योजनेतुन बाहेर पडता येणार नाही. ज्या कालावधीत योजनेप्रमाणे थकबाकी भरण्याच्या पर्याय मजीप्रा ग्राहक योजनेत प्रविष्ट होतांना निवडतील त्यानुसार त्यांना विलंब आकार अनुज्ञेय होईल.

 

जर प्रथम निवडलेल्या पाणी पट्टी व विलंब आकार थकबाकी अदाईचा कालावधी काहीही कारणाने पाळणे शक्य झाले नाही. तर ज्या तिमाहित शेवटचा हप्ता विहित मुदतीचा आत भरतील त्या तिमाही नुसार जो एकुण कालावधी होईल. त्यानुसार विलंब आकारात योजने प्रमाणे अनुज्ञेय सवलत मिळेल. तसे करावयाचे झाल्यास ताळमेळाप्रमाणे निश्चित झालेली सर्व रक्कम वसुल पात्र राहील. व विलंब आकार गोठविण्याची कार्यवाही निरस्त होऊन विलंब आकाराची रक्कम पुर्ववत लागु राहिल. मध्येच योजनेतुन बाहेर पडल्यास अथवा योजनेप्रमाणे थकीत रक्कमेचा पुर्णत: भरणा न केल्यास सदर संस्था व व्यक्ती या योजनेचा लाभ घेतालाच नाही असे समजण्यास पात्र राहील व गोठविलेल्या विलंब आकार दंडनीय व्याजाची रक्कम पुर्वलक्षी प्रभागावाने लागु राहील व देय राहील व अभय योजनेतील कोणतीही सुट अनुज्ञेय राहणार नाही.

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे कोकण विभागांतर्गत 5, नागपूर 10, पुणे 14, नाशिक 7, तर अमरावती विभागांतर्गत 15 अशा एकुण 51 पाणी पुरवठा केंद्राकडे दि.31 मार्च 2020 अखेर पाणी पट्टीची एकुण मुद्यल 516.29 कोटी व विलंब आकार 403.30कोटी अशी एकुण 919.59 कोटी थकबाकी असुन या बद्यल सातत्याने प्रयत्न करूनही थकबाकी कमी न झाल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 148 व्या बैठकीत वसुलीसाठी प्रोत्साहनात्मक अशी अभय योजना प्रस्तावित करण्यात आली. त्यानुषंगाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या दि.12 जानेवारी 2022 च्या शासन पत्रान्वये म.जी.प्रा. ग्राहकांना प्रोत्साहन मिळणेकरिता विलंब आकार सवलतीची अभय योजना लागु करण्याच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

00000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती