Sunday, July 31, 2022

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.1 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.24), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.39), अरुणावती (329.28), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.71), वान (405.20), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.55), पेनटाकळी (556.90), खडकपूर्णा (519.44).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (443.10), चंद्रभागा (502.70), पूर्णा (448.22), सपन (507.45), पंढरी (426.70), गर्गा (344.50), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.78), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.70), मोर्णा (366.20), उमा (343.25), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.96), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.50), पलढग (401.75), मस (324.50), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.31 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 31 जुलै 2022 रोजी सकाळी           7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.24), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.26), अरुणावती (329.19), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.89), वान (405.10), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.53), पेनटाकळी (556.80), खडकपूर्णा (519.28)

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.92), चंद्रभागा (502.60), पूर्णा (448.14), सपन (507.30), पंढरी (426.70), गर्गा (344.50), बोर्डीनाला (362.00), यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.79), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.70), मोर्णा (366.10), उमा (343.15), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.85), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.50), पलढग (401.70), मस (324.45), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.  

00000

 

 

 

 

 

 

 

 

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे आजपासून खादी उत्सव



स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे आजपासून खादी उत्सव

अमरावती, दि. ३१ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व कस्तुरबा सोलर खादी महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरातील तापडिया सिटी सेंटरमधील तिसऱ्या  मजल्यावर खादी उत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते उद्या, दि. १ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी आज दिली.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रम हा नाविन्यपुर्ण पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील २१ गावांमध्ये अडीचशे महिलांना सौर चरखे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 कस्तुरबा सोलर खादी महिला समितीमार्फत अमरावती जिल्हयातील शेतकऱ्यापासून कापूस खरेदी करून त्यापासून कच्चा माल तयार करतात. विविध गावातील चरख्यावर सुत कताई करून त्यापासून सौर खादी कापड व विविध सौर खादी उत्पादनाची निर्मिती केली जाते.

 संपूर्णतः महिलांनी महिलांसाठी राबविण्यात आलेला हा देशातील एकमेव प्रकल्प आहे.

 

 

या प्रकल्पामध्ये अमरावती जिल्हातील ३०० पेक्षा जास्त महिलांना कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झाला असून हा प्रकल्प पूर्णतः सामाजिक भावनेतून ना नफा ना तोटा या तत्वावर राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अमरावती जिल्हयातील धारणी तालुक्यातील १०० आदिवासी महिलांचा समावेश आहे. तसेच धारणी तालुक्यातील मांडू या गावी विणकाम केंद्र स्थापन केले असून तेथील १५ पेक्षा जास्त युवक- युवतीना उदरनिर्वाहाकरिता कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा संस्थेचा उद्देश आहे.

या प्रकल्पाअंतर्गत राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमा अंतर्गत (MSICDP) अमरावती एम आय डी सी येथे ग्रीनफॅब सोलर खादी प्रोसेसिंग क्लस्टर या नावाने सामुहिक सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या सामुहिक सुविधा केंद्रामध्ये ८० टक्के शासनाचा सहभाग आहे.

अमरावतीकरांनी या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन खादी ग्रामोद्योग कार्यालय व कस्तुरबा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

 

 

 

 


अमरावती विभागात जूनपासून आतापर्यंत 501.4 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 3.8 मि.मि. पाऊस

 अमरावती विभागात

जूनपासून आतापर्यंत 501.4 मिमि पावसाची नोंद

विभागात सरासरी 3.8 मि.मि. पाऊस

 

अमरावती दि 31 (विमाका) : अमरावती विभागातील 56 तालुक्यात पाऊस झाला. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेधच्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत विभागात सरासरी 3.8 पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 501.4 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती ‘महावेधच्या नोंदीनुसार दुपारी बारावाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.

अमरावती जिल्हा : धारणी 0.0 (492.7), चिखलदरा 0.0 (789.9), अमरावती 3.0 (419.8), भातकूली 3.8 (341.2), नांदगाव खडेश्वर 1.8 (520.0), चांदूर रेल्वे 8.8 (448.9), तिवसा 4.2 (597.4), मोर्शी 1.0 (521.2), वरुड 1.3 (548.3), दर्यापूर 1.0 (324.9), अंजनगाव 0.0 (385.3), अचलपूर 0.3 (375.4), चांदूरबाजार 6.9 (560.6), धामणगाव रेल्वे 2.4 (624.6) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 2.4 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 486.5 मि.मि. पाऊस झाला.

अकोला जिल्हा :- अकोट 0.0 (260.3), तेल्हारा 0.0 (370.5), बाळापूर 0.4 (472.6), पातूर 3.9 (405.2),  अकोला 2.2 (448.0), बार्शी टाकळी 27.8 (370.4), मुर्तीजापूर 0.1 (353.8), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 4.2 मि.मि. तर आजवर 385.8 मि.मि पाऊस झाला आहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.8 (299.8), संग्रामपूर 0.2 (368.6), चिखली 0.4 (438.4), बुलडाणा 1.7 (546.4), देऊळगाव राजा 3.4 (415.8), मेहकर 0.1 (456.8), सिंदखेड राजा 10.0 (463.8), लोणार 13.0 (385.3), खामगाव 0.0 (326.9), शेगाव 0.3 (405.0), मलकापूर 0.0 (291.3), मोताळा 0.0 (322.4), नांदूरा 0.0 (316.8), जिल्ह्यात दिवसभरात 2.1 तर यंदाच्या हंगामात आजवर 393.7 मि.मि. पाऊस झाला.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 4.7 (609.5), बाभूळगाव 2.4 (620.8), कळंब 1.1 (626.9), दारव्हा 15.6 (489.7), दिग्रस 7.1 (598.6), आर्णी 5.0 (761.2), नेर 4.0 (546.3), पुसद 7.4 (478.5), उमरखेड 2.9 (608.0), महागाव 2.9 (686.5), वणी 2.3 (855.1), मारेगाव 12.5 (798.3), झरीजामणी 2.2 (744.7), केळापूर 9.1 (744.7), घाटंजी 9.1 (619.8), राळेगाव 3.9 (801.0), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 5.7 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 657.7 मि.मि पाऊस झालाआहे.

वाशिम जिल्हा : - वाशिम 0.3 (483.8), रिसोड 9.8 (520.1), मालेगाव 1.0 (527.6), मंगरुळपिर 1.5 (519.6), मानोरा 23.2 (590.3), कारंजा 0.1 (374.4), जिल्ह्यात 24 तासात 5.2 तर 1 जूनपासून आजवर 498.0 मि.मि. पाऊस झाला.

****

'हर घर तिरंगा' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन

 


'हर घर तिरंगा' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे

- विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन

 

अमरावती,दि. ३१ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट या काळात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा, यासाठी सर्व नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनातस्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. १३  १५ ऑगस्ट या कालावधीसाठी 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हयातील, प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा याकरीता या उपक्रमामध्ये सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे व ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भरीव जनजागृती करावी. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यालये, आस्थापना, नागरिक, संस्था यांना  उपक्रमात सहभागी करून घ्यावे. अधिकाधिक लोकसहभाग मिळवून उपक्रम यशस्वी करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. पांढरपट्टे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अशी आहे ध्वजसंहिता

         ध्वजसंहितेनुसार, आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरीपासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवण 3:2 या प्रमाणात असावी. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील, याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो.

     राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये.राष्ट्रध्वज लावताना, इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुले किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही, तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा.

      ध्वजावर कोणते प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वज स्तंभाच्या वर अथवा आजूबाजूला काही लावू नये, ध्वज जमिनीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अगर पाण्यामध्ये बुडणार नाही अशा पद्धतीने लावावा. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करणं दंडनीय अपराध आहे. त्यामुळे ध्वजाचा उपयोग गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबलवर टेबल क्लॉथ प्रमाणे टाकणे, ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करणे, ध्वजाचा रुमाल, उशी किंवा शर्ट आदींवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे.

 

     राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. तसेच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे, त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये. राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आहे. आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल अशा प्रकारे कृत्य करू नये.

     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात घरोघरी ध्वज फडकावा व ध्वज संहिता पाळण्यात यावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000

 

 

 

 

 

 

 

 

Friday, July 29, 2022

महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाबाबत सकारात्मकता निर्माण करावी - प्रधान सचिव मनीषा वर्मा

 











महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाबाबत

सकारात्मकता निर्माण करावी

-         प्रधान सचिव मनीषा वर्मा

‘आकांक्षा कौशल्यातुन जीवनोन्नतीकडे..’ सामंजस्य करार

          अमरावती दि. 29 (विमाका): रोजगाराविषयी प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण करुन रोजगार प्राप्त होईपर्यंत सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे सातत्याने समुपदेश करावे. प्रेरणादायी सत्र, उद्योजक कंपन्यांचे भरती मेळावे व विषय तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे नियमीत आयोजन करावे. प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत सकारात्मकता या महिलांमध्ये निर्माण करावी, अशा सुचना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी दिल्या.

आकांक्षा कौशल्यातुन जीवनोन्नतीकडे कार्यक्रमातंर्गत अमरावती व नागपुर विभागातील युवती व महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या प्रशिक्षण प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी व नवगुरुकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर, दिल्ली यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

         आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवती व महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ‘आकांक्षा कौशल्यातुन जीवनोन्नतीकडे’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली.

जिल्हाधिकारी पवनीत कौर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले, सहायक संचालक नरेंद्र येते, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी के विसाळे, प्रविण आत्राम, प्रबोधिनीचे संचालक गजेंद्र बावणे, नवगुरुकुल फाउंडेशच्या संचालिका निधी अनारकत आदी यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पातंर्गत प्रशिक्षणासाठी विज्ञान शाखेत पदवी प्राप्त युवती व महिलांना संधी देण्यात येणार असुन त्यांची प्रवेशासाठी निवड करीत असतांना पालकांना प्रशिक्षणाबाबतचे नियम, निवासाबाबत असलेली सुरक्षितता, भोजन व आदी बाबींची माहिती देण्यात यावी. दुर्बल घटकातील महिलांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्थिरता प्रदान होईल असा विश्वास श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केला .

अमरावती नागपुर विभागातील प्रशिक्षणासाठी इच्छुक 5 हजार 465 महिलांनी नोंदणी केली असुन 2 हजार 224 महिलांनी ऑन लाईन चाळणी परीक्षा दिली. त्यापैंकी 1 हजार 307 महिलांनी ही चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रवेशासाठी चार टप्प्यांमध्ये चाळणी परीक्षा घेण्यात येणार असुन प्रवेशाबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहीती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केद्रांचे सहायक आयुक्त प्रफुल शेळके यांनी दिली.

                                               000000

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 


विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.29 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 29 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.18), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (396.84), अरुणावती (328.95), बेंबळा (266.45), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.56), वान (404.90), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.50), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (519.0).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.44), चंद्रभागा (502.40), पूर्णा (448.53), सपन (507.65), पंढरी (426.70), गर्गा (344.70), बोर्डीनाला (362.25),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.76), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.50), मोर्णा (365.80), उमा (343.15), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.85), सोनल (451.90), एकबुर्जी (150.90), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.40), पलढग (401.60), मस (324.40), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक सुविधा द्याव्या - आशिष बिजवल

 





कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक सुविधा द्याव्या

-         आशिष बिजवल

जिल्हा कृती दलाच्या बैठकित दिले निर्देश

            अमरावती दि. 28 (विमाका): कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांना कायदेशिर हक्क व आवश्यक न्यायिक मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महिला व बालविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही  करावी. या बालकांना शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधेचा तात्काळ लाभ द्यावा असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिले. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातुन कोविड-१९ आपत्तीमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षण व संगोपनासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा श्री बिजवल यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

महिला व बालकल्याण उपायुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) कैलास घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, राजश्री कौलखेडे, मंगल पंचाळ, माविमचे जिल्हा समन्वयक सुनिल सोसे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले, परिविक्षा अधिकारी सुभाष अक्वार, जिल्हा संरक्षण अधिकारी राजेश नांदने, चाईल्ड लाईन समन्वयक अमित कपुर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष किरण पुंशी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री बिजवल म्हणाले, ज्या बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत त्यांचे बँक खाते तात्काळ उघडण्यात यावे, त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात यावा, या बालकांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच राज्य शासनाकडुन देण्यात येणारी आर्थिक मदत त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी असे सांगितले. खाजगी शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या बालकांचे शैक्षणिक शुल्क भरतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने संबंधित शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधावा. समन्वयातुन या समस्येचे निराकरण करण्याबाबत श्री बिजवल यांनी सांगितले.

दोन्ही पालक गमावलेले सर्व बालके पर्यायी पालकांच्या जवळ त्यांच्या कुटूंबात रहात असुन बालगृहात असलेल्या एका बालिकेची पर्यायी पालकत्वाच्या माध्यमातुन निवासाची व्यवस्था करण्यात यावी असे सांगुन या बालकांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दलाने महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या सर्व शासकिय विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचना श्री बिजवल यांनी केल्या.

 

लसीकरणाबाबत जनजागृती

कोरोना लसीकरणाबाबत सर्व शासकीय कार्यालये, अशासकीय संस्था, बालकांचे संगोपन व संरक्षण करणाऱ्या सामाजिक संस्थांनी लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करावी. अठरा वर्षे वयोगटातील युवक-युवतींमध्ये लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. आरोग्य विभागाच्या मदतीने बालकांची कोरोना तपासणी, विलगीकरण व त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात यावे. लसीकरणाची बुस्टर मात्रा अद्याप न घेतली नाही त्या नागरिकांसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात यावे, असे श्री बिजवल यांनी सांगितले.

00000

Thursday, July 28, 2022

जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या सोडतीमध्ये 66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित

 





जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या सोडतीमध्ये

66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित

 

 

अमरावती, दि.28 : अमरावती जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूकीव्दारे गठित होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आला असून यात 66 जागांपैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.

जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभाग (गट-66 साठी) ही आरक्षण सोडत नियोजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, निवडणूक शाखेचे प्रमोद देशमुख तसेच विविध गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. प्रारंभी गावांची नावे नमूद असलेली प्रत्येक चिठ्ठी उपस्थितांना दर्शवून नंतर पारदर्शी डब्यात सर्वांसमोर त्याची सरमिसळ करुन जय संदीप राहटे व रुचल मिलींद गंधाडे या बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानंतर संबंधित गावाचे नाव  जाहीर करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या सदस्य पदासाठी चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, अमरावती, अचलपूर, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली, चांदूररेल्वे, धामगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर अशा 14 तालुक्यातील 66 जागांसाठी सोडत करण्यात आली. 66 जागांपैकी महिलांना 33 जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती 12 पैकी महिला 6, अनुसूचित जमाती 13 पैकी महिला 7, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.)  7 पैकी महिला 4, सर्वसाधारण 34 पैकी महिला 16 अशा जागांची सोडत निघाली. निवडणूक शाखेचे अधिकारी तसेच महसुल सहायक अनुपम उईके, प्रकाश माहोरे, किशोर झोंबाडे आदींनी सोडत प्रक्रिया राबविण्यासाठी सहाय्य केले.

00000

संकटग्रस्त महिलांना वन स्टॉप क्रायसेस सेंटरचा आधार

 

संकटग्रस्त महिलांना वन स्टॉप क्रायसेस सेंटरचा आधार

          अमरावती, दि.28: संकटात सापडलेल्या महिलांना काळजी व संरक्षणाची गरज असते. अशा गरजू महिला, मुलींनी वन स्टॉप क्रायसेस सेंटरची गरजेच्या वेळी मदत घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

          हुंडाबळी, ऑनर किलींग , ॲसिड हल्ला , लैंगिंक छळ, बाल लैगिंक छळ, लैगिंक व्यापार, बाल विवाह, भ्रूणहत्या, सती प्रथा, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिला अशा संकटात सापडलेल्या महिलांसाठी वन स्टॉप क्रायसेस सेंटर मदतनीस ठरते. या योजनेमध्ये एका छताखाली वैद्यकीय सुविधा, पोलिस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र, कायदेशीर मदत, अन्न, वस्त्र, निवारा मोफत पुरविण्यात येतो.

         जिल्हा स्त्री रुग्णलाय, येथे दिनांक 1 जून 2017 पासून वन स्टॉप क्रायसेस सेंटर कार्यरत आहे. या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षेतेखाली या सेंटरची  त्रैमासिक बैठक आयोजित करून आढावा घेण्यात येतो. वन स्टॉप क्रायसेस सेंटरची आढावा बैठक नुकतीच पार पडली. हे सेंटर सुरु झाल्यापासून आजपावतो 122 पिडीत लाभार्थ्यांनी केंद्रातील सोयीसुविधांचा लाभ घेतलेला असल्याची माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे.

00000

 

 

 

अग्निपथ योजनेतंर्गत सैन्य भरतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्टपर्यंत

 

अग्निपथ योजनेतंर्गत सैन्य भरतीसाठी

 अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्टपर्यंत

 

     अमरावती, दि.28: अग्निपथ योजनेंतर्गत होतकरू सुशिक्षित अविवाहित तरूणांसाठी सैन्य भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्ट 2022पर्यंत आहे. सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात (बुलडाणा सोडून) ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. स्टेट रिझर्व पोलिस फोर्स, ग्रुप 4, नागपूर येथे या भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नागपूर भरती कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

          इच्छुक उमेदवारांनी www.joiniindianarmy.nic.in या वेबसाईटवर लॉग-इन करून ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. दिनांक 10 ऑगस्ट 2022 पासून ई-मेलव्दारे प्रवेशपत्र पाठविण्यात येणार आहे. त्या प्रिंट आऊटसह भरतीच्या ठिकाणी दिलेल्या तारखेस व वेळेत संबंधित उमेदवारांनी पोहचणे आवश्यक आहे. तरी या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी केले आहे.

00000

Wednesday, July 27, 2022

कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

 

कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत

यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

 

            अमरावती, दि.27: कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत हे जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात कार्यरत असतांना साहसी पराक्रमासाठी त्यांना महामहिम राष्ट्रपती यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी ‘सेना मेडल  प्रदान करून त्यांच्या गौरव केला. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर केला. कर्नल अक्षय सुरेश भगत सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सेवारत असल्यामुळे त्यांचे वडील सुरेश भगत यांना जिल्हा सैनिक अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार, बारा लाख रूपयांचे रोख पारितोषक प्रदान करण्यात आले.

कुमाऊ रेजिमेंटचे कमांड अधिकारी कर्नल अक्षय सुरेश भगत हे जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात कार्यरत असतांना 28 सप्टेंबर 2020 रोजी त्यांना आतंकवादयासंबंधी गुप्त माहिती प्राप्त झाली. ते लगेच आपल्या बरोबर काही निवडक जवान घेवून स्वत: मोहिमेवर निघाले. त्यांनी योग्य योजना आखून ताबोडतोड त्याजागेला घेरले. परंतु आतंकवादयांनी त्यांच्यावर हातगोळांच्या व इतर हत्यांरानी गोळ्यांचा वर्षाव केला. त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी त्याचे प्रतिउत्तर दिले. त्यामध्ये त्यांचा एक जवान जखमी झाला. त्या जवानाला त्यांनी प्रथमोपचार करून सुरक्षित जागेवर ठेवून शोध मोहिम सुरू ठेवली. त्यावेळी खूप रात्र झाली होती. अशातही त्यांनी जेसेबीच्या लाईटचा वापर करून दुसऱ्या आंतकवादयास ठार केले.

0000

 

 

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात

कारगिल विजय दिवस साजरा

 

अमरावती, दि.27 : सैनिकी मुलींचे वसतीगृह येथे कारगिल विजय दिवस (26 जुलै) साजरा करण्यात आला. मेस्को अधिकारी मेजर जोशी, कारगील युद्धामध्ये भाग घेतलेले माजी हवालदार निर्मल कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीसह सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनेचे अध्यक्ष, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यावेळी उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्ज्वलनानंतर दोन मिनिटे मौन बाळगून शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वीर पत्नी व वीर माता यांचा साडी, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माजी मेजर जोशी यांनी माजी सैनिक, वीर माता आणि वीर पत्नी यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

00000

 

‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’पॉवर @ 2047 चा शुभारंभ विविध मान्यवरांची उपस्थिती

 






‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्यपॉवर @ 2047 चा शुभारंभ

विविध मान्यवरांची उपस्थिती

 

अमरावती, दि.27 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि जिल्हा प्रशासनामार्फत ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य पॉवर @ 2047 या उर्जा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. गेल्या आठ वर्षात उर्जा क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीचा वेध घेण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यात आज मोर्शी येथेही स्वतंत्र कार्यक्रम झाला.

नियोजन भवनात शुभारंभ सोहळा झाला. आमदार सुलभाताई खोडके अध्यक्षस्थानी होत्या. आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, सुनील राणा, महावितरण प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता महावितरण पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता पारेषण जयंत विके, उपव्यवस्थापक दीपक जैन, मयुर मेंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, दीपक देवहाते, सुनील शेरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अर्थचक्राला गती देण्यात ऊर्जेची भूमिका महत्त्वाची - आमदार सुलभताई खोडके

तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या अर्थचक्राला गती देण्यात ऊर्जेची भूमिका महत्त्वाची आहे. वीज नसेल तर विकास थांबतो. त्यामुळे विकासाची जननी असलेल्या ऊर्जा विकासात ऊर्जा विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभाताई खोडके यांनी केले.

उज्ज्वल भारत उज्ज्वल महोत्सवातून वीज क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा जागर - आमदार प्रविण पोटे पाटील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा एक भाग म्हणून देशाची वाटचाल अपारंपरिक ऊर्जा निर्मितीकडे झाली आहे. ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल महोत्सवात वीज क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा जागर करण्यात आला आहे. ही बाब प्रशंसनीय आहे. याचाच एक भाग म्हणून ऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या घरावर सौर पॅनेल बसवून इतरांनाही प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन आमदार प्रविण पोटी पाटील यांनी केले. वादळ, वारा पावसात अविरत काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले.

मेळघाटातील अती दुर्गम भागातील 7 गावांच्या विद्युतीकरणात उर्जा विभागाला यश - आमदार प्रताप अडसड

      देशातील भौगोलिक परिस्थितीचे आव्हान असतांनाही ऊर्जा विभागाने देशभर वीजेचे जाळे विणले आहे. त्यामुळे 2018 मध्ये 100 टक्के गावांचे विद्युतीकरण आणि 100 टक्के घरांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात ऊर्जा विभागाला यश आले आहे. तसेच मेळघाटातील अती दुर्गम भागातील सात गावांचे विद्युतीकरणही उर्जा विभागाने केले असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले.

उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य हा कार्यक्रम आजादी का अमृत महोत्सवाचा भाग आहे. ऊर्जा क्षेत्रात मागील आठ वर्षात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ऊर्जेच्या बाबतीत तुट असलेला भारत देश आता ऊर्जा पुरवठा करणारा झाला आहे. जिल्ह्यात अतिदुर्गम असलेल्या मेळघाटातील 7 आदिवासी पाड्याचे ऊर्जीकरण करणे ही महावितरणची उल्लेखनीय कामगिरी आहे. या शिवाय 21 कोटींचा निधी हा पारंपरिक पध्दतीने ऊर्जीकरण न झालेल्या 24 गावांसाठी राखून ठेवण्यात आला आहे.

मेळघाटातील ऊर्जा विकासासाठी धारणीत 132 केव्हीचे उपकेंद्र उभारण्यात आले आहे. त्यासाठी मध्यप्रदेश नेपानगर मधून वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच हिवरखेड ते धारणी असा 90 किमी लांबीचे डबल सर्कीट अती दुर्गम भागातून टाकण्यात आले असल्याची माहिती महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिली.

वीज क्षेत्राची यशोगाथा असलेल्या चित्रफिती यावेळी दाखविण्यात आल्या. तसेच नुक्कड नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा विकासाबाबत माहिती देण्यात आली. जिल्हास्तरावर विविध योजनेतून पूर्ण झालेल्या कामांची माहिती असलेल्या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. लाभार्थ्यांनी यावेळी मनोगतही व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी केले. संचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांनी तर मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी आभार मानले.

00000

 

 

 

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...