अग्निपथ योजनेतंर्गत सैन्य भरतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्टपर्यंत
अग्निपथ
योजनेतंर्गत सैन्य भरतीसाठी
अर्ज भरण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्टपर्यंत
अमरावती, दि.28: अग्निपथ योजनेंतर्गत होतकरू
सुशिक्षित अविवाहित तरूणांसाठी सैन्य भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 ऑगस्ट
2022पर्यंत आहे. सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर
2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात (बुलडाणा सोडून) ही
भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. स्टेट रिझर्व पोलिस फोर्स, ग्रुप 4, नागपूर येथे
या भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नागपूर भरती कार्यालयामार्फत कळविण्यात
आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी
www.joiniindianarmy.nic.in या वेबसाईटवर लॉग-इन करून ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
दिनांक 10 ऑगस्ट 2022 पासून ई-मेलव्दारे प्रवेशपत्र पाठविण्यात येणार आहे. त्या प्रिंट
आऊटसह भरतीच्या ठिकाणी दिलेल्या तारखेस व वेळेत संबंधित उमेदवारांनी पोहचणे आवश्यक
आहे. तरी या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक
कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिषकुमार
गायकवाड यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment