प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 सहभागी होणेसाठी शेतकऱ्यांना आवाहन.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022
सहभागी होणेसाठी शेतकऱ्यांना आवाहन.
अमरावती, दि.7: अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये राबविण्याबाबत दिनांक ०१ जुलै २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार ही योजना खरीप २०२२ व रब्बी २०२२-२३ हंगामाकरिता कब आणि कॅप मॉडेल (80:110) नुसार राज्यात राबविण्यात येत आहे.
योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकयांना विमा संरक्षण देणे. शेतकऱ्यांना नाविण्यपुर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे.
खरीप हंगामात समाविष्ट पिके :- भात, ज्वारी, मका, तुर, मुग, उडीद, सोयाबिन, कापूस,
राज्यात खरीप हंगाम 2022 मध्ये योजना खाली नमुद केलेल्या विमा कंपनीकडुन संबंधित जिल्हा समुहामध्ये राबविण्या येणार आहे.
समाविष्ट जिल्हे बुलढाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ नियुक्त केलेली विमा कंपनी भारतीय कृषि विमा कंपनी, पत्ता - मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-400023 ई-मेल - pikvima@aicofindia.com टोल फ्री क्रमांक 18004195004 आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पत्ता- माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लाट नं. 246, सी विंग, बंडगार्डन, पुणे- 411001 ई-मेल customersupportba@
जिल्हा बुलढाणा भात- ज्वारी 642.50 सोयाबीन 1110.00 मुग 516.34 उडीद 520.50 तुर 736.04 कापूस 2999.15 मका 711.96 अकोला भात- ज्वारी 600.00 सोयाबीन 1082.00 मुग 456.00 उडीद 456.00 तुर 736.04 कापूस 2580.00 वाशिम ज्वारी 600.00 सोयाबीन 1080.00 मुग 456.00 उडीद 456.00 तुर 736.00 कापुस 2580.00 अमरावती भात 880.00 ज्वारी 580.00 सोयाबीन 1060.00 मुग 440.00 उडीद 440.00 तुर 736.04 कापुस 2750.00 यवतमाळ ज्वारी 570.80 सोयाबीन 924.20 मुग 509.00 उडीद 509.00 तुर 736.04 कापुस 2310.00
योजनेचे वैशिष्टये :
प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.50 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. या योजने अंतर्गत खरीप सन 2022 व रब्बी हंगाम सन 2022-23 या एक वर्षाकरीता जोखिमस्तर सर्व अधिसुचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
या वर्षी काही पिकांमध्ये महसुल मंडळामधील पिकांचे सरासरी उतपादन नोंदवितांना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनास 10 टक्के भारांकन आणि पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास 90 टक्के भारांकन देवुन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.
ई-पिक पाहणी शेतक-यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पिक पाहणीमध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेलं पिक अंतीम गृहीत धरण्यात येईल.
पिक संरक्षणाच्या बाबीं :
योजनेअंतर्गत जोखमींची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणारी घट. पिक पेरणी/ लावणीपुर्व नुकसान- यात पुराचा पाऊस, हवामानातील त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी / लावणी होवु शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे. इतर प्रतिकुल घटकामुळे अधिसुचित मुख्य पिकाची हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत पुर, पावसातील खंड व दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतक-याच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या 50 टक्क्यांहुन अधि घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे.
काढणी पश्चात चक्री वादळ, व अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरुन ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान झ्याल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक
आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. (युध्द व अणु युध्दाचे दुष्परिणाम हेतु पुरस्पर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्या जोग्या धोक्यास विमा संरक्षण मिळत नाही) मात्र काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखमी अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकयांनी सर्वे नं. नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासुन 72 तासाचे आत संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक राहील.
प्रस्ताव सादर करण्याची अंतीम मुदत व तपशिल :
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकयांनी बँकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2022 आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिक कर्ज घेतल्यास शेतक-यांना देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतक-याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतीम दिनांका आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतक-यांनी आपला 7/12 चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवुन अधिकृत बँकेत विमा अर्ज देवुन व हप्ता भरुन सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोच पावती शेतक-यांनी जपुन ठेवावी. कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आपले सरकारचे मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेवु शकता. www.pmfby.gov.in या पोर्टलवर माहिती सुरु आहे. या वर्षीच्या खरीप हंगाम 2022-23 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिक
विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती यांनी केलेले आहे.
0000
Comments
Post a Comment