Tuesday, April 30, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

 






जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

                  अमरावती, दि. 1 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन करून त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सूचना प्रचारण अधिकारी मनिष फुलझेले, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, तहसिलदार भाग्यश्री देशमुख तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

 










जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण

 

             अमरावती, दि. 1 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरणात पार पडला. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

              सोहळ्याला विशेष पोलिस  महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सहायक जिल्हाधिकारी मीनू पी. एम., सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनूरी, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

               सोहळ्याच्या प्रारंभी  राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त श्रीमती. डॉ. पाण्डेय यांनी खुल्या जीपमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा, शहर पोलीस, अग्निशमन दल, दामिनी पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका वाहन, वज्र वाहन, फॉरेन्सीक वाहन, वरुण वाहन, दंगल नियंत्रण पथक, श्वान पथक, पोलीस बँड आदी विविध पथकांनी शानदार संचलन केले. संचलनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यावेळी प्रशासनातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यासह शालेय विद्यार्थी, वीरमाता, वीरपत्नी व त्यांचे कुटुंबीय, विविध क्षेत्रांतील नागरिक आदी उपस्थित होते.  प्रा. गजानन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

नोंदणी न झालेल्या मतदारांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


नोंदणी न झालेल्या मतदारांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती, दि. 30 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी उत्साहात मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढवली. परंतु काही मतदार संघामध्ये मतदारांचे नाव मतदान यादीमधून गहाळ किंवा सापडत नसल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुषंगाने ज्या मतदारांचे नांवे सापडत नसेल किंवा गहाळ झालेली असेल अशा मतदारांनी मतदार यादीमध्ये समाविष्ट करणेकरीता फार्म क्र. 6 भरुन संबंधित बीएलओ, तहसिलदार कार्यालय किंवा ऑनलाईनव्दारे नोंदणी करुन मतदार यादी समाविष्ट करुन घ्यावे. मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरु असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

            अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रावर मतदारांचे नाव गहाळ झाल्याबाबत काही वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिध्द झाले. भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, दुबार, मयत, स्थलांतरीत करणे व दुरुस्तीकरीता दि. 1 जुन 2023 पासुन जिल्ह्यामध्ये कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याकरीता फार्म क्र. 6 भरुन घेणे, मयत झालेले, कायम स्वरूपी स्थलांतरीत झालेले मतदार यांचेकरीता फार्म नं.7 भरुन घेण्यात आले. तसेच स्थानांतरणाकरीता फार्म नं. 8 भरुन घेण्याची प्रक्रिया दि. 16 ऑक्टोंबर 2023 पर्यंत राबविण्यात येऊन दि. 27 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली.  प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर मतदार यादी तपासुन मतदार यादीमध्ये नांव असल्याबाबत किंवा मतदार यादीमध्ये नांव सापडत नसेल, किंवा गहाळ झालेले अशा मतदारांना दि. 17 ऑक्टोंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 या चार महिण्याच्या कालावधीत आक्षेप नोंदविणे, दावे व हरकती दाखल करण्याकरीता अवधी देण्यात आले. या कालावधीत ज्या व्यक्तीनी आक्षेप नोंदविले, अशांना नोटीस देवून त्यांचे आक्षेप निकाली काढण्यात आले. मतदार नोंदणी कार्यक्रमाबाबत विविध माध्यमाव्दारे प्रसिद्धी देऊन जनजागृती करण्यात आले. तसेच वेळोवेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधीसोबत बैठका घेऊन मतदार नोंदणीबाबत आवाहन करण्यात आले. त्यानंतर दि. 23 जानेवारी 2024 रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आले. मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर सुद्धा नामनिर्देशन पत्र स्विकारण्याच्या अंतिम तारखेच्या 10 दिवस अगोदरपर्यंत मतदार यादीतुन नांवे वगळणे, नाव समाविष्ट करणे, नांव स्थानांतरीत करण्याची प्रक्रिया सुरुच होती. नामनिर्देश दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दि. 4 एप्रिल 2024 रोजी यादी मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली.

भारत निवडणूक आयोगाचे कार्यक्रमानुसार 07-अमरावती सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक दि. 26 एप्रिल रोजी शांततेत पार पडली. या निवडणूकीमध्ये अमरावती मतदार संघातील 18 लक्ष 36 हजार 078 मतदार मतदानाकरीता पात्र होते. या निवडणूकीकरीता एकुण 1 हजार 983 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. याकरीता 1 केंद्राध्यक्ष व 3 मतदान अधिकारी असे एकुण 7 हजार 932 कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आली. तसेच 10 टक्के पथकाकरीता 793 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले, असे एकुण 8 हजार 725 कर्मचाऱ्यांची नेमणूक निवडणुकीसाठी करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होवू नये. तसेच मतदारांना प्रलोभन देण्यात येवून मतदारांना मतदानाकरीता प्रवृत्त करण्यात येवू नये, या करीता जिल्हास्तरावर एसएसटीचे 21, व्हीएसटी 23, एफएसटी 56 असे एकुण 100 पथके तयार करण्यात आली. या पथकांनी आपली कामगीरी चोख बजावून जिल्ह्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार निर्देशनात आले नाही.

दिव्यांग व 85 वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा प्रथमच देण्यात आली. ही मोहिम दि. 12 ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत करण्यात आली. यामध्ये 1 हजार 104 व अत्यावश्यक सेवा मतदार सात असे एकूण 1 हजार 111 मतदारांने मतदानाचा हक्क बजावला. तसेच जे कर्मचारी निवडणूक ड्युटीवर कार्यरत आहे अशा कर्मचाऱ्यासाठी ईडीसीकरीता पोस्टल बँलेट मार्फत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. दि. 26 एप्रिल 2024 रोजी पात्र मतदारापैकी 11 लक्ष 69 हजार 121 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून 63.67 टक्के मतदानाची नोंद केली. मागील 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये 11 लक्ष 07 हजार 063 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मागील 2019 मध्ये झालेल्या मतदानापेक्षा 62 हजार 058 मतदारांनी या निवडणूकीत जास्त मतदान करुन मतदानाची टक्केवारीत झाली, अशी माहिती उप जिल्हा निवडणुक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.

00000

महाराष्ट्र दिनानिमित्त जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य सोहळा

 


महाराष्ट्र दिनानिमित्त जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य सोहळा

            अमरावती, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ उद्या , दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जवाहरलाल नेहरु स्टेडियम, मोर्शी रोड अमरावती येथे होईल. विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मुख्य ध्वजारोहण सोहळा राज्यभर एकाच वेळी सकाळी आठ वाजता होणार असल्याने सकाळी 7.15 ते 9 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कुठलाही शासकीय समारंभ किंवा अर्धशासकीय सोहळा घेण्यात येऊ नये. तसेच सर्वांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा,  अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

00000

 

Monday, April 29, 2024

जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक; खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांची कृषी विभागाला सूचना

 



जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक;

खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांची कृषी विभागाला सूचना

 

              अमरावती, दि. 29 (जिमाका):  आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. जिल्ह्यात खते, बियाणे, कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही, याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कृषी विभागाला दिल्या.

     

          जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिनेश डागा, महाउर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल तायडे, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक एस.पी. देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.       

 

            जिल्ह्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6 लाख 81 हजार हेक्टर असून, सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पिके आहेत. गतवर्षी खरीप पिकाचे 6 लाख 76 हजार हे. पेरणी क्षेत्र होते. येत्या हंगामासाठी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी, उडीद व मका आदी पिकांसाठी 1 लक्ष 12 हजार 125 क्विंटल बियाण्याची गरज आहे. सोयाबीन या मुख्य पिकासाठी 98 हजार 758 क्विंटल, कपाशीसाठी 7 हजार 306 क्विंटल व तुरीसाठी 6 हजार 356 क्विंटल बियाणे लागणार आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात मक्याचा पेरा जास्त असतो. त्यामुळे मक्याचे 4 हजार 980 क्विंटल बियाणे लागणार आहे. शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. 

 

            युरिया, एसएसपी, डीएपी, संयुक्त व मिश्र खते आदी सर्व खतांसाठी 1 लक्ष 38 हजार 400 मे. टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी 60 हजार 650 मे. टन खतसाठा उपलब्ध आहे. उर्वरित अपेक्षित खतसाठा वेळेत उपलब्ध होईल यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. तृणधान्याला चांगली मागणी व भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे. कृषी विषयक माहिती शेतकऱ्यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्या वाढवावी. त्याचप्रमाणे, घरच्या बियाण्यांचा वापर वाढविणे, उगवण क्षमता तपासणी, माती परिक्षण, ठिंबक व सूक्ष्म सिंचनाद्वारे खत वापर आदींसाठी प्रयत्न व्हावेत. खत आवंटनानुसार दरमहा पुरवठ्याचे संनियंत्रण करण्यासाठी तालुकानिहाय पथक तयार करुन संबंधितावर कारवाई करावी. नॅनो युरिया वापर वाढविण्यासाठी  शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन नॅनो युरियाचा वापर वाढवावा, असे  निर्देश श्री. कटियार यांनी यावेळी दिले. 

           

00000

Saturday, April 27, 2024

07- अमरावती लोकसभा मतदार संघ-अंतिम टक्केवारी 63.67


 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक; मतदारसंघात सर्वत्र उत्साहात मतदान

07- अमरावती लोकसभा मतदार संघ-अंतिम टक्केवारी 63.67
दिव्यांग मतदारांनी सुविधांचा लाभ घेत केले मतदान, सर्वत्र शांतततेत मतदान
मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांनी दिला उत्तम प्रतिसाद

अमरावती, दि. 27 (जिमाका): 07- अमरावती लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. त्यानुसार सकाळी सात वाजतापासूनच मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाले. मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अमरावती लोकसभा मतदारसंघात अंतिम आकडेवारीनुसार सरासरी 63.67 टक्के मतदानाची नोंद झाली.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
मतदानाची विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम टक्केवारी याप्रमाणे : बडनेरा मतदार संघात 55.78, अमरावती मतदार संघात 57.51, तिवसा मतदार संघात 64.14, दर्यापूर मतदार संघात 66.88, मेळघाट मतदार संघात 71.55, अचलपूर मतदार संघात 68.84 टक्के असे एकुण अमरावती लोकसभा मतदार संघात 63.67 टक्के मतदान झाले.
लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणूकीत मतदान करताना अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. मतदारसंघात उत्सवात मतदारराजाने सक्रीय सहभाग घेत मतदान केले. मतदानाला ग्रामीण भागात भरभरुन प्रतिसाद मिळाला, तर शहरी भागातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावल्या. मतदारराजाने मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदान जास्त प्रमाणात करुन प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली. दिलेल्या या प्रतिसादामुळे जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडले. सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.
विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय यांच्यासह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कॅम्प परिसरातील सेंट थॉमस शाळेत सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा प्रशासनाने यावेळी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे दिव्यांग मतदारांनी सुविधांचा लाभ घेत उत्साहात मतदान केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक महिला मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र व यंग एम्प्लॉयीज मतदान केंद्र याप्रमाणे प्रत्येकी 6 महिला, दिव्यांग व एम्प्लॉयीज मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. तसेच बडनेरा मतदार संघातील मनपा उर्दु प्राथमिक मुलांची शाळा, जूनी वस्ती बडनेरा येथे रेन्बो मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. मतदान केंद्रावर दिव्यांगांकरिता सक्षम ॲपच्या माध्यमातून व्हीलचेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
अमरावती विधानसभा मतदारसंघातील सेंट थॉमस, जि.प. उर्दु हायस्कुल, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विदर्भ ज्ञान-विज्ञान महाविद्यालय तसेच राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालय, समर्थ हायस्कुल याठिकाणी सकाळी सात वाजतापासूनच मतदानासाठी लांब रांगा दिसून आल्या. राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालयाच्या सखी मतदान केंद्रावर महिलांची विशेष उपस्थिती दिसून आली. तसेच दिव्यांग व वयोवृध्द व्यक्तींसाठी स्थापित करण्यात आलेल्या कॅम्प क्षेत्रातील जिल्हा परिषद माजी कन्या शाळेतील मतदान केंद्रावर दिव्यांग व जेष्ठ नागरिकांची गर्दी दिसून आली. गाडगेनगर परिसरातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावरही मतदारांची गर्दी दिसून आली. सर्व मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदान यादी, पिण्याचे पाणी, दिव्यांग व जेष्ठ व्यक्तींसाठी व्हीलचेअर, सावलीचा मंडप, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह आदी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती.

Thursday, April 25, 2024

मतदानाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी; केंद्रांवरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

 











मतदानाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी;

केंद्रांवरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

 

         अमरावती, दि. 25 (जिमाका):  उद्या होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत मनपा आयुक्त देविदास पवार, जि.प.चे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  विजय भटकर, बडनेरा मतदार संघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय जाधव, अमरावती तहसिलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते. 

 

        जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी सेंट थॉमस इंग्लिश स्कुल  येथील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर जूनी वस्ती बडनेरा येथील ऊर्दू प्राथमिक शाळा तसेच पंचायत समिती, भातकुली अंतर्गत उत्तमसरा प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, कनेक्टीव्हिटी, वीजेचा पुरवठा, शौचालयाची सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्पची सुविधा यासह इतर बाबींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

 

       दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर उपलब्ध ठेवावी. तसेच रॅम्पही सुस्थितीत असावा. मतदानाच्या दिवशी मतदारांचे उन्हापासून सुरक्षितेसाठी मतदान केंद्रावर मंडप व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध ठेवाव्यात. मतदान केंद्रावर एकाचवेळी गर्दी होणार नाही यासाठी योग्य नियोजन करण्याचेही सूचना जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिल्या.

00000

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

             अमरावती, दि.25 (जिमाका) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी  सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.  अमरावती लोकसभा मतदारसंघातील सर्व कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आदेश जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्गमित केले आहे.

 

            उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 5 एप्रिल रोजीच्या शासन निर्णयानुसार निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांना लागू राहील. खासगी कंपन्या, सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, उपाहारगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, रिटेलर्स, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, व्यापार, औद्योगिक उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे.  अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टीऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी आस्थापना किंवा कारखाना मालकाने जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. मतदानासाठी सुट्टी किंवा पूर्वपरवानगीने सवलत न दिल्यास आस्थापना धारकाविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

                                                        00000

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक; मतदानासाठी यंत्रणा सज्ज मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 





लोकसभा सार्वत्रिक निवडणुक; मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

        अमरावती, दि. 25 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता असून मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज पत्रकार परिषदेत केले. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

 

          07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 28 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. दि. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. तर दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. अमरावती मतदार संघाची निवडणुक दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्या, शुक्रवार दि. 26 रोजी मतदान होणार असून आयोगाने मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठरवून दिलेली आहे. तर दि. 4 जून रोजी मतमोजणी असून आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

 

1 हजार 983 मतदान केंद्रे

07- अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुष मतदार 9 लाख 44 हजार  213,  महिला मतदार 8 लाख 91 हजार 780 तर ट्रॉसजेंडर मतदार 85 असे एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. 

37 उमेदवार रिंगणात

अमरावती लोकसभा मतदार संघात 37 उमेदवार रिंगणात उभे असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे : 

राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : श्रीमती नवनीत रवि राणा(भारतीय जनता पार्टी-कमळ), बळवंत बसवंत वानखडे(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-हात), संजयकुमार फत्तेसींग गाडगे (बहूजन समाज पार्टी-हत्ती), इंजी. अविनाश हरिषचंद्र धनवटे(पिपल पार्टी ऑफ इंडीया डेमोक्रॅटीक-फळांची टोपली), श्री. आनंदराज यशवंत आंबेडकर(रिपब्लिकन सेना-गॅस सिलेंडर),  श्री.गणेश नानाजी रामटेके (अखिल भारतीय परीवार पार्टी-किटली), श्री.गाजी सादोद्दीन जहिर अहमद (राष्ट्रीय ओलमा कौंसील-ऑटो रिक्षा), दिगांबर वामन भगत(नकी भारतीय एकता पार्टी-स्पॅनर),  श्री. दिनेश गणेशराव बुब(प्रहार जनशक्ती पक्ष-शिट्टी), श्री.नरेंद्र बाबुलाल कठाने(देश जनहित पार्टी-शाळेचे दप्तर), श्री.भाऊराव संपतराव वानखडे(ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक-सिंह), ॲड राजु मधुकरराव कलाने (बहूजन भारत पार्टी-जहाज), श्रीमती. सुषमा गजानन अवचार(जय विदर्भ पार्टी-रुम कुलर)

 अपक्ष : श्री. अनिल ठवरे ऊर्फ अनिलकुमार नाग बौद्ध(अपक्ष-पेनाची निंब सात किरणांसह), श्री.अरुण यंशवंतराव भगत (अपक्ष-हातगाडी), किशोर भिमराव लबडे(अपक्ष-एअर कंडिशनर), श्री. किशोर ज्ञानेश्वर तायडे(अपक्ष-कपाट), गौतम उर्फ अनंता रामदास इंगळे(अपक्ष-रोड रोलर), श्रीमती तारा सुरेश वानखडे(अपक्ष-दुरदर्शन), श्री. प्रभाकर पांडुरंग भटकर(अपक्ष-लॅपटॉप), श्री.प्रमोद रामकृष्ण चौरपगार(अपक्ष-हिरा), ॲड. पृथ्वीसम्राट मुकिंदराव दिपवंश(अपक्ष-भाला फेक), भरत चंपतराव यांगड(अपक्ष-नागरिक), श्री.मनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे(अपक्ष-काचेचा पेला), मानकर ज्ञानेश्वर काशीराव (अपक्ष-काडे पेटी), श्री. रवी गुणवंत  वानखडे(अपक्ष-टेबल), श्री. राजु महोदवराव सोनोने(अपक्ष-खाट), श्री.राजेश तुळशिराम खडे(अपक्ष-सफरचंद), श्रीमती. वर्षा भगवंत भगत(अपक्ष-बॅटरी टॉर्च), श्रीकृष्ण सखाराम क्षिरसागर(अपक्ष-संगणक), श्री.सतिश यंशवंतराव गेडाम(अपक्ष-ट्रक), श्रीमती. सुमित्रा साहेबराव गायकवाड(अपक्ष-प्रेशर कुकर), श्री. सुरज धनराज नागदवने(अपक्ष-पेट्रोलपंप),  श्री. सुरेश पुंडलीक मेश्राम(अपक्ष-ईस्त्री), श्रीमती सोनाली संजय मेश्राम(अपक्ष-बॅट), श्री. संदिप बाबुलाल मेश्राम(अपक्ष-गॅस शेगडी), श्री.हिम्मत भिमराव ढोले(अपक्ष-शिवणयंत्र).

 

मतदान पथकांच्या वाहतुकीसाठी व्यवस्था

                         मतदान पथके नेमुन दिलेल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मुख्यालयावरुन नियोजित मतदान केंद्रावर रवाना होणार असून मतदान पथकांचे परिवहन व्यवस्थेकरीता एस.टी महामंडळाची 227  बसेस, ट्रक 22, दुर्गम भागाकरीता क्रुझर 72, मिनी बसेस 20 व जीप 84  वापरण्यात येणार आहेत.

 

ओळखीसाठी 12 पुरावे ग्राह्य

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळख पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.

         आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

 

मतदानाच्या दिवशी सुट्टी

            प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे याकरिता शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. ही  सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व स्थापना कारखाने दुकाने इत्यादींनाही लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता, येईल असेही शासनाने जाहीर केले आहे.

 

पुरेसा बंदोबस्त

कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनामार्फत आवश्यक प्रमाणात पोलीस बल तैनात ठेवण्यात आला असून संवेदनशील मतदान केंद्राचे ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात राज्य राखीव दलाच्या व केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या जादा तुकड्यांची कुमक मागविण्यात आली आहे.

 

 

मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अमरावती लोकसभा मतदार संघात शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूकीकरीता मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी आठवडी बाजारामुळे मतदान केंद्राच्या परिसरात गर्दी होऊन मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा पोहोचू नये म्हणून संबंधित गावांतील आठवडी बाजार दि. 26 एप्रिल रोजी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहे.

 

विशेष उपक्रम

जिल्हयात प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक महिला मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र व यंग एम्प्लॉयीज  मतदान केंद्र  याप्रमाणे प्रत्येकी 6 महिला, दिव्यांग व एम्प्लॉयीज मतदान केंद्र ठेवण्यात आले आहेत. तसेच बडनेरा मतदार संघातील मनपा उर्दु प्राथमिक मुलांची शाळा, जूनी वस्ती बडनेरा येथे रेन्बो मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांकरीता विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सक्षम ॲपद्वारे व्हीलचेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानुसार या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

दिव्यांग व वयोवृद्धांसाठी गृहमतदान

भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहेत. यासाठी 12 डी नमुना भरून देणे आवश्यक होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जानुसार 1 हजार 167 नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली होती. त्यापैकी 1 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 922 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 182 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला.

 

993 मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील 993 मतदान केंद्राचे वेब कास्टींग करण्यात येणार आहे. तसेच वेब कास्टींग मॉनिटरींग करण्यासाठी एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रावर सुक्ष्म निरिक्षक नेमण्यात आले आहेत.

 

वोटर हेल्पलाईन ॲप सुविधा

मतदारांच्या सोयीसाठी व त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्याकरीता वोटर हेल्पलाईन ॲप्स तयार करण्यात आले असून क्यूआर कोड सुद्धा जाहिर करण्यात आला आहे. तसेच https://electoralsearch.eci.gov.in   या लिंकवरुन सुद्धा त्यांचे नाव मतदार यादीत असल्याबाबतची खात्री करुन घेता येईल.

                                                     00000

 

 

शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना

 














शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना

पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना

18 लाख 36 हजार 078 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जिल्ह्यात 1 हजार 983 मतदान केंद्र ; मेळघाटात 354 सर्वाधिक मतदान केंद्र

 

अमरावती, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत.

जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून तेथील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री. शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. अमरावती मतदारसंघाकरिता ईव्हीएम गोडावून न.1 (लोकशाही भवन) विद्यापीठ रोड येथून वितरण झाले. तिवसा मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर, सातरगाव रोड तिवसा, दर्यापूर मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर,दर्यापूर, मेळघाट मतदारसंघाकरिता फातिमा कान्वेंट हायस्कुल हॉल तर अचलपूर मतदारसंघाकरिता कल्याण मंडपम्, कोर्ट रोड या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात 354 सर्वाधिक मतदान केंद्र मेळघाटात असून सर्वात कमी 309 मतदारसंघात अचलपूर येथील आहे. बडनेरा मतदारसघांत 337 मतदानकेंद्र, अमरावती मतदारसंघात 322, तिवसा मतदारसंघात 319, दर्यापूर मतदारसंघात 342 याप्रमाणे एकूण 1 हजार 983 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर या सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र (पिंक बुथ), एक दिव्यांग मतदान केंद्र, युवा अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. तसेच बडनेरा मतदारसंघातील मतदान केंद्र 257 - मनपा उर्दु प्राथमिक मुलांची शाळा क्र.10 खोली क्र.4 जुनी वस्ती बडनेरा हे इंद्रधनुष्य (Rainbow) या थीमवर असणार आहे. आणि धामणगाव रेल्वे येथील जि.प.प्रायमरी मराठी शाळा खोली क्र.1 उसळगव्हाण हे मतदान केंद्र आदिवासी मतदान केंद्र या थीमवर असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहेत. जिल्ह्यातील 993 मतदान केंद्रावर वेब कास्टींगव्दारे निगरानी ठेवली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रावर सावली मंडप, प्रतिक्षा कक्ष, एनएसएस/एनसीसी स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक आदी सुविधा मतदारांना पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व  सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे.

0000

खर्च निरीक्षक यांचेकडून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या लेख्याची तिसरी तपासणी

 

खर्च निरीक्षक यांचेकडून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या लेख्याची तिसरी तपासणी

            अमरावती,  दि.25(जिमाका) : अमरावती लोकसभा मतदार संघात एकूण 37 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. उमेदवारांच्या लेख्यांच्या दुसऱ्या तपासणीवेळी एकूण 37 उमेदवारांपैकी दोन उमेदवार अनुपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना 48 तासांच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक सनियंत्रण व खर्च कक्षात सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली असून विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे कळविण्यात आले आहे.

           

            उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्याकरीता खर्च निरीक्षक अनुपकुमार वर्मा  यांची नेमणूक भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे. काल दि. 24 एप्रिल रोजी उमेदवारांच्या लेख्यांची तिसरी तपासणी खर्च निरीक्षकांकडून करण्यात आली. यामध्ये तीन उमेदवारांनी तिसऱ्या तपासणीच्या वेळी त्यांच्या दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला आहे. परंतू तो शॅडो खर्च नोंदवहीसोबत तुलनात्मकरित्या जुळून येत नाही. तसेच त्यांच्या खर्चाचा काही भाग त्या उमेदवारांनी सादर केला नाही. अशा उमेदवारांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस जारी केली असून 48 तासांच्या आत आपले म्हणणे लिखित स्वरुपात निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षात विहित मुदतीत सादर करावी. सादर न केल्यास शॅडो खर्च नोंदवहीनुसारच हा खर्च उमेदवारांना मान्य असे गृहीत धरुन त्यांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल व ही तफावत संबंधित उमेदवारास मान्य नसल्यास त्यांनी आपल्या खुलाश्यामध्ये तो मान्य नसल्याच्या सुस्पष्ट कारणांसह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे लिखित स्वरुपात सादर करावा लागेल. ते निवेदन खर्च निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा खर्च सनियंत्रण समितीसमोर सादर करण्यात येईल. त्यानुसार ही समिती या तफावतीबाबत विविध कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करेल. त्याचबरोबर विहित मुदतीत खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध भादंवि कलम 171 (1) अन्वये तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल, असे यावेळी कळविण्यात आले.

                       

          तिसऱ्या तपासणी अंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर 1 जुलै 2024 रोजी आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येईल. खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच उमेदवारांचा खर्च भारत निवडणुक आयोगाकडे सादर केला जाईल. तपासणीचे वेळी खर्च निरीक्षक अनुपकुमार वर्मा, नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे, सहायक नोडल अधिकारी विजय देशमुख, डॉ. दिनेश मेतकर, तसेच संपर्क अधिकारी प्रमोद पालवे व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

                                                         000000

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...