Tuesday, January 31, 2017

                   







कॅशलेस इकॉनॉमीसाठी युवकांनी उत्प्रेरक म्हणुन काम करावे
                                                     जिल्हाधिकारी
                             * डिजीधन जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन
        
अमरावती, दि. 31 (जिमाका) :  कॅशलेस इकॉनॉमीसाठी राज्यातील पथदर्शी कार्यक्रम अमरावती शहरात राबविण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा येाजनेच्या सर्व विद्यार्थ्यानी अमरावती  शहर 100 टक्के  कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रयत्न करावे. युथ कॅन मेक अ चेंज ॲन्ड लेटस शो दॅट धीस कॅन बी डन असा आत्मविश्वासपुर्ण आशावाद जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आज नियोजन भवन येथे आयोजित कार्यशाळेत केला.
          महाराष्ट्र  डिजीधन जनजागृती कार्यक्रम कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके ,सहायक अग्रणी बॅक अधिकारी चौबे यासह मुख्यमंत्री कार्यालयातील   शिष्यवृत्तीधारक स्वप्नील पुरी ,सचिन अहीर, विवेक चिराणीया ,किर्ती खंडेलवाल ,ऋषीकेश सरोदे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले की रोकडरहीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच डिजीटल पेंमेट पध्दतीच्या प्रचार प्रसारासाठी देशभरात अनेक प्रयोग सुरू आहेत. यासाठी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत देशातील 607 जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चा मंथनातुन सामान्य जनतेला डिजीटल पेंमेटकडे प्रेरीत करण्यासाठी अनेक नवीन संकल्पना समोर येत आहेत. देशातील  पाच अग्रेसर  राज्यांच्या मुख्यमंत्र्याचा गट सुध्दा याबाबतीत काम करत आहे. त्यामध्ये आंध्रप्रदेश, सिक्कीम महाराष्ट आदीसह अन्य्‍ दोन राज्यांचा समावेश आहे.
जिल्हयात 360 बॅंका असुन त्यामधील 60 बॅंक शहरात असुन उर्वरीत 28 बॅंक ह्या ग्रामीण भागात आहे. या बॅंकेच्या माध्यमातुन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चमुसोबत एक बॅंक शाखा जोडण्यात येणार आहे अशी माहीतीही जिल्हाधिकाऱ्यांनी  यावेळी दिली.
डिजीटल हरीसालच्या माध्यमातुन अतिदुर्गम भागात सुध्दा आपल्या जिल्हयात प्रयोग करण्यात आला आहे. डिजीधन जनजागृती कार्यक्रमातील 31 जानेवारी ते 12 फेबुवारी या  पहील्या टप्प्यानंतर एप्रील महीन्यात दुसरा टप्पा राबविण्यात येईल. नार्वे या देशात 86 टक्के जनता दैनंदिन आर्थिक व्यवहार डिजीटल पध्दतीने करतात. सार्वजनिक क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी कॅशलेस इकॉनॉमी अंगीकारावी लागेल. 
 मुख्यमंत्री फेलोशिप योजनेत देखील जिल्हयातील  युवक युवतींनी अर्ज करावेत असे आवाहन किरण गीतते यांनी केले. डिजीधन कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 25 शहर, दुसऱ्या टप्प्यात 350 नगरपालीका, नगरपरिषद व तिसऱ्या टप्प्यात 28 हजार गावात हा कार्यक्रम राबविण्यात येईल. पथदर्शी कार्यक्रमातील त्रुट्या, अडचणीवर मात करुन भविष्यात हा कार्यक्रम राज्यात अन्य शहरात राबविण्यात येईल असे ही त्यांनी सांगीतले.   मात्र टॉप टु बॉटम ॲप्रोच असलेला हा राज्यातील पहीलाच कार्यक्रम आहे. जिल्हयात एकुण 30 लाख लोकसंख्या आहेत. शहराची लोकसंख्या 8 ते 9 लाख आहे. मात्र फक्त 64 हजार नागरीक म्हणजे 8 टक्के नागरीक डिजीटल पेमेंट करतात. म्हणुन उर्वरीत लोकांना डिजीटल पेमेंटकडे वळविण्यासाठी भरपूर वाव आहे.
जगातील कोणत्याही विधायक कार्यात तरुणांनी चेंजमेकरची भुमिका बजावली आहे. युवकांनी झोकुन देऊन अमरावती शहराला या कार्यक्रमात अग्रेसर बनवुन युवकांनी बदल घडवावा. शहरातील 32 महाविद्यालयातील जवळपास 6 हजार एनएसएस स्वयंसेवकांमार्फत हा डिजीधन जागरूकता कार्यक्रम राज्यातील पथदर्शी कार्यक्रम अमरावती शहरात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी डिजीदुत म्हणुन काम करावे. उत्तम काम करणाऱ्या टिमला राज्यस्तरावर पुरस्कृत करण्यात येईल .या पथदर्शी कार्यक्रमातील यशस्वीतेनंतरच संपूर्ण राज्यात अन्यत्र हा कार्यक्रम राबविण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले. यावेळी डिजीटल पध्दतीने पेंमेट करण्याचे प्रात्यक्षीक जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभटी व अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके यांनीही समयोचित विचार मांडले .कार्यक्रमाचे संचालन किर्ती खंडेलवाल यांनी केले. कार्यक्रमाला विदयार्थ्यांची लक्षणीय उपसिथती होती.

वाघ/राणे/हरदुले/31-01-17/14-22 वाजता


Monday, January 30, 2017

हुतात्मा दिनानिमीत्त मौन आदरांजली

अमरावती जिमाका दि.30 - हुतात्मा दिनानिमीत्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनीट मौन पाळुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किरण ‍गित्ते अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभटटी जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके  व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

00000

वाघ/सागर/30-1 -2017/17-27 वाजता



                           डिजीधन जागरूकता मोहीम 
            राज्यातील पथदर्शी कार्यक्रम अमरावती शहरात राबविणार

        अमरावती, दि.27 (जिमाका): रोकडरहीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच डिजीटल पेमेट पध्दतीच्या प्रचार प्रसारासाठी राज्यातील पथदर्शी कार्यक्रम अमरावती शहरात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी डिजीदुत म्हणुन काम करावे. उत्तम काम करणाऱ्या टिमला राज्यस्तरावर पुरस्कृत करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयेाजित बैठकीत केले. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके यासह समन्वयक ऋषीकेश सरोदे व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                  
          या पथदर्शी कार्यक्रमासाठी अमरावती जिल्ह्याची निवड करण्यात आली असुन 32 महाविद्यालयातील जवळपास 6 हजार एनएसएस स्वयंसेवकांमार्फत हा डिजीधन जागरूकता कार्यक्रम शहरात 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या पहील्या टप्पयात राबविण्यात येईल. याच अनुषंगाने उद्या नियोजन भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत मुख्यमंत्री कार्यालयातील चमुकडुन सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. डिजीधन जागरूकता मोहीम ही दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. 12 फेब्रुवारी नंतर परीक्षेच्या कालावधी संपल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल. एनएसएस स्वयंसेवकांना वेगवेगळ्या डिजीटल पेमेंट पध्दतीविषयी  प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे स्वयंसेवक महाविद्यालयात व प्रत्येक वर्गावर्गात जाऊन डिजीटल पेमेंटविषयी जागरूकता करतील.  उत्कृष्ट काम करणाऱ्या टिमला पुरस्कृत करण्यात येईल.
या पथदर्शी कार्यक्रमातील यशस्वीतेनंतरच संपूर्ण राज्यात अन्यत्र हा कार्यक्रम राबविण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले.
बैठकीचे प्रास्ताविक व आभार ऋषीकेश सरोदे यांनी केले.

000000

वाघ/सागर/कुमार -30-1 -2017/17-22 वाजता








Sunday, January 29, 2017

              विभागीय आयुक्तांनी घेतली पदवीधर उमेदवारांची बैठक

        अमरावती, दि.29 : पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणुक निर्णय अधिकारी तथा  विभागीय आयुक्ता जे.पी गुप्ता यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व उमेदवार व राजकीय पक्षाच्या प्रतिनीधींची बैठक घेतली.       
         या बैठकीला निवडणुक निरीक्षक विकास देशमुख, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक  विभागातील सहाय‍क निवडणुक निर्णय अधिकारी अमरावती जिल्हाधिकारी किरण गित्ते, बुलढाणा जिल्हाधिकारी विकास झाडे, वाशिम जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, यवतमाळ जिल्हाधिकारी संचिद्रप्रताप सिंग, अधिकारी उपस्थित होते.  
 सहायक निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना आज डमी मतपत्रीका उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पदवीधर निवडणुकीसाठी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येईल.
निवडणुक आयोगाने दिलेल्या परवानगीनुसार मतमोजणीसाठी  14 ऐवजी 30 टेबलवर  होणार असल्याने मतमोजणी वेगात होईल. मतदान केंद्रापासुन 200 मिटर वाहन लावता येणार नाही. राजकीय पक्षांना 200 मिटर परिसराच्या अतंरावरुन  मतदारचिठ्ठी देता येईल. मतदानाच्या दिवशी सकाळी 7 वाजता मतदान प्रतिनिधींना केंद्रावर उपस्थित राहावे. पदवीधर निवडणुकीसाठीचा प्रचार 1 फेबुवारी रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यत करता येईल.
शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी नैमीत्तीक रजा  आहे व  खासगी आस्थापनावरील कार्यरत लोकांना मतदानासाठी दोन तीन तासाची मुभा देण्यात येईल. उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनीधीनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आयुक्तांनी दिली. सर्व राजकीय पक्षानी आदर्श आचारसंहीतेचे पालन करुन सहकार्य करावे  असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

00000
वाघ/सागर/खंडारकर/29-1-2017/15-10 वाजता





   चिखलदरा महोत्सव उत्साहात करा
विभागातील प्रत्येक जिल्हयात पर्यटन महोत्सव आयोजित करावा
विभागीय आयुक्त

        अमरावती,दि. 29 : चिखलदरा  महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर विभागातील अन्य जिलहयांनी पर्यटन महोत्सव आयोजित करावेत अशी सुचना विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी दिल्या. चिखलदरा महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी आयेजित बैठकीत बोलत होते.           
         या बैठकीला विभागातील अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते,बुलढाणा जिल्हाधिकारी विकास झाडे,वाशिम जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी,जिल्हाधिकारी यवतमाळ संचिद्रप्रताप सिंग,धारणी उपविभागीय अधिकारी षण्मुखराजन चिखलदरा  नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, प्रवीण येवतीकर व इतर अधिकारी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी गेल्या बैठकीतील मुद्यांना अनुसरून माहिती दिली.
आयुक्त म्हणाले की पर्यटनवाढीसाठी चिखलदऱ्यांच्या धर्तीवर बुलडाणा जिल्हयात येत्या मार्च महिन्यात लोणार महोत्सव होत आहे. अकोला जिल्ह्यातही नरनाळा महोत्सव असतो.पर्यटन महोत्सवाच्या निमीत्ताने स्थानिक  कलावंताना प्रोत्साहन मिळते.
        चिखलदरा महोत्सवासाठी अंदाजे 50 लक्ष निधी अपेक्षीत असुन जिल्हा नियोजन समिती व न.प. चिखलदरा सिडको महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या सर्व संस्थानी मिळुन निधी उभारायचा आहे. लोकांना महोत्सवात तीनही दिवस मनोरंजनाचा आंनद घेता आला पाहीजे या दृष्टीने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करावे. वन विभागाने तसेच छायाचित्रकारांसाठी फोटो प्रदर्शनाचे आयेाजन करावे अश्या सुचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिल्यात. पर्यटकांना माकडापासुन संरक्षण देण्यासाठी वनविभागाने ताबडतोब कार्यवाही करावी तसेच वेगवेगळया पॉईटवरील अतीक्रमीत दुकानांना हटवावे अशी सुचना  विभागीय आयुक्तांनी दिली.

00000000

वाघ/सागर/29-1-2017/14-15 वाजता



Saturday, January 28, 2017

वॉटर कप स्पर्धेमुळे धारणीची समृध्दीकडे वाटचाल सुरु होईल
                                                - जिल्हाधिकारी
* स्पर्धेत सहभागी होणारा पहिला आदिवासी तालुका
* 109 गावांचा सहभाग
 
* म.ग्रा.रो.ह यो
  मध्ये काम करण्यास सवलत.
          अमरावती, दि 28 : निसर्गाने समृद्धीच दान मेळघाटला दिल आहे. इथे पावसाळ्यात 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. पण उन्हाळ्यात इथे वन्यजीवांसोबतच माणसांनाही पाण्यासाठी भटकावे लागते. कारण याभागात पडणारे पावासाचे पाणी वाहून जाते. वॉटर कप स्पर्धेमुळे पावसाचे पाणी अडवून साचलेल्या पाण्यातून धारणी तालुक्याची समृद्धीकडे वाटचाल सुरु होईल. यासाठी प्रत्येक गावाने सत्यमेव जयते वॉटर कप  स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.
          पाणी फाउंडेशन च्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धा-2 मध्ये यावर्षी धारणी तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. धारणी हा महाराष्ट्रातील या स्पर्धेत सहभागी होणारा एकमेव आदिवासी तालुका आहे. त्यासाठी आज धारणी येथे आयोजित पहिल्या  कार्यशाळेत  मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. या कार्यशाळेला पाणी फाउंडेशनचे प्रकल्प प्रमुख डॉ अविनाश पोळ, उपविभागीय अधिकारी  शनमुख राजन, तहसीलदार ए.जी.देवकर, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख उपस्थित होते.
          वॉटर कप  ही शासनाची योजना नाही. यासाठी शासनाचा कोणताही  आदेश  नाही, निधी नाही,  तरीही मागील वर्षी 116 गावांनी यामध्ये सहभाग घेतला आणी आपले गाव श्रमदानाने जलसमृद्ध केले. मागील वर्षी जिल्ह्यातील वरुड तालुक्याचा समावेश केला होता. यातील वाठोडा गावाने 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळवले. यावर्षी धारणी तालूक्याचा समावेश आपण केला आहे. तालुक्यातील 156 पैकी 109 गावे यामध्ये सहभागी होत आहेत. एवढया मोठ्या प्रमाणात गावांचा सहभाग असलेला हा एकमेव तालुका आहे असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
          आदिवासी अजूनही जल, जंगल, जमिनिशी नाळ जोडून आहेत. पण त्याचबरोबर त्यांची गरिबीशी जुळलेली नाळ दुर्दैवी आहे. म्हणूनच या स्पर्धेत सहभागी होताना या आदिवासिंचा रोजगार हिरावल्या जाऊ नये म्हणून केवळ या तालुक्यासाठी  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून काम करण्यास सवलत देण्यात आली आहे. आता गावकऱ्यांनी 45  दिवस 8 तासांपेक्षा जास्तीचे दोन तास काम करून आपले गाव या स्पर्धेत प्रथम येण्यासाठी श्रमदान करावे. म्हणजे या तालुक्याला लागलेला कलंक मिटून संपन्न तालुका अशी नवी ओळख निर्माण होईल. धारणीतील कष्टकरी आदिवासी हे काम करून दाखवतील असा विश्वास श्री गित्ते यांनी  यावेळी  व्यक्त केला.
          डॉ.अविनाश पोळ  पाणी फाउंडेशनचा या स्पर्धेमागचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्याना त्याचे  विज्ञान, तंत्रज्ञान शिकवण्याची गरज आहे. गावातली एक व्यक्ती प्रशिक्षित झाल्यास  ते ज्ञान संपूर्ण गावापर्यंत पोहचेल. एकही पैसा न देता गावे या स्पर्धेत सहभागी होतील का अशी शंका पहिल्या वर्षी होती. पण 116 गावांनी सहभागी होऊन गावाला पाणीदार करण्यासाठी गावकरी श्रमदान करायला तयार असल्याचे सिद्ध केले. मागील वर्षी ज्या गावाने पहिले बक्षीस मिळवले त्या गावात यावर्षी 4 कोटी रुपयांच्या बटाट्याचे उत्पादन घेतले असल्याची माहितीही त्यांनी दिली. धारणी या आदिवासी तालुक्याचा समावेश या स्पर्धेत होणे हे या भागाचे भविष्य बदलण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असेही श्री पोळ  यावेळी म्हणाले.
          या कार्यशाळेत धारणीच्या अनेक दुर्गम गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शिवाय वनविभाग आणि पंचायत समितीचे कर्मचारीही सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी तेलंग तर आभार तहसीलदार देवकर यांनी मानले. 

00000





Wednesday, January 25, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
                                          
          अमरावती, दि.26 : भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याहस्ते सकाळी 8-10 वाजता ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले त्यानंतर राष्ट्रध्वजास सलामी दिली. तसचे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी व मान्यवरांना प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा दिल्या.
          यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा पुरवठा अधिकारी डि.एस.वानखडे, उपजिल्हाधिकारी प्रविण ठाकरे, परिविक्षाधिन आय.ए.एस. अधिकारी राहुल करडिले, विनोद शिरभाते, गजेंद्र बावने, जिल्हा नियोजन अधिकारी रविंद्र काळे, जिल्हा सुचना अधिकारी रणवीर, तहसिलदार सुरेश बगळे, विशेष कार्यअधिकारी अनिल भटकर, विधी अधिकारी ॲड.नरेंद्र बोरा, माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000
वाघ/बारस्कर/सागर/26-01-2017/ 11-25  वाजता




भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन
उत्साहात साजरा
पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण

          अमरावती, दि.26 : भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन समारंभ जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री  प्रविण पोटे यांच्याहस्ते मुख्य शासकीय समारंभात सकाळी 9-15 वाजता ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर लगेच राष्ट्रगीत झाले त्यानंतर सर्वांनी राष्ट्रध्वजास सलामी दिली.
          यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अतिरिक्त विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक, राज्य राखीव पोलिस बल गटाचे समादेशक जी.बी.डाखोरे, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख, मनपा आयुक्त हेमंत पवार, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन.आभाळे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थींनी, वरिष्ठ पत्रकार, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
          पालकमंत्री प्रविण पोटे यांनी स्वातंत्रसंग्राम सैनिकांना व थोर विभुतींना विनम्र अभिवादन करुन सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
          यावेळी मैदानावरील सर्व उपस्थित पथकाकडून पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्र्यांनी संपुर्ण परेडचे निरीक्षण केले. यामध्ये पोलिस विभाग, राज्य राखीव दल, शहर पोलिस वाहतूक शाखा, स्काऊट गाईड, गृह रक्षक दल तसेच आरोग्य विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, कुष्ठरोग निर्मुलनासाठीचा आरोग्यरथ, पोलिस विभागाचे श्वान पथक, बँड पथक आदिंनी मानवंदना दिली. शहरातील प्रमुख शाळेतील विद्यार्थी विद्यार्थींनींनी लेझीम, कवायती आदी आकर्षकपणे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.   
00000

वाघ/बारस्कर/सागर/दि.26-01-2017/11-17 वाजता











Thursday, January 5, 2017

               पदवीधर मतदारसंघाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर
                          निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी
        अमरावती, दि. 5 (जिमाका) : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असुन निवडणूक  कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. अधिसुचनेचा प्रसिद्धी दिनांक 10 जानेवारी, 2017 आहे. नामनिर्देशित पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 17 जानेवारी, असून दिनांक 18 जानेवारी रोजी नामनिर्देशित पत्रांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस 20 जानेवारी असून 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. 6 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येईल. दिनांक 9 फेब्रुवारी पूर्वी निवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल. मतदार यादी 7 जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदारांनी त्यांच्या नावाची खातरजमा करावी . दिनांक 4 जानेवारी पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली असून अमरावती ‍ जिल्हयामध्ये आदर्श आचार संहितेचे पालन करावे असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
000000

वाघ/दि.05-01-2017/15-40 वाजता
सामान्य जनतेला उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देणार
पालकमंत्री प्रविण पोटे
* पालकमंत्र्यांच्या हस्ते तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचे लोकार्पण  

        अमरावती, दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य जनतेला उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणार यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे व वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या भर्तीसाठी पाठपूरावा करणार असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी शिरजगाव कसबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी केले.
          यावेळी व्यासपिठावर चांदूर बाजार नगरपालिकेचे नगाराध्यक्ष रवीभाऊ पवार, जिल्हा परिषद सदस्य मनोहर सुने, जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव, मोहनलाल साबू, सरपंच अविनाश बदकुले उपस्थित होते.
          पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते आज शिरजगाव कसबा, मोथा ता.चिखलदरा, पथ्रोट या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण झाले. शिराळा येथील नाला खोलिकरण, सुरळी येथील व्यायाम शाळेचे भूमिपूजन, करजगाव व चांदूर बाजार येथील कामांचे भूमिपूजन सुद्धा पालकमंत्र्याहस्ते पार पडले.
          यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, शिरजगाव कसबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही उत्तम व सुसज्ज आरोग्य सेवा असलेली जिल्ह्यातील एकमेव इमारत आहे. टेलिमेडिसन व जेनेरिक मेडिसीन द्वारा गरिबातल्या गरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे. एवढेच नव्हे तर 2022 पर्यंत सर्वसामान्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरांचा लाभ मिळणार आहे.
          यावेळी या आरोग्य केंद्रासाठी 2 एकर जागा दान देणारे मोहनलाल साबू यांचा पालकमंत्र्याच्‍या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. समाजात मोहनलाल साहू यांच्यासारखे दानशूर व्यक्तीमुळे सद्भावाची व समाज हिताची वृत्ती कायम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
          यावेळी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच भूमिपूजन पालकमंत्र्याच्या हस्ते झाले. यावेळी मोहनलाल साबू यांनी, सोहनी मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव यांनी तर संचालन अशोक यावूल यांनी केले.
00000
वाघ/गावंडे/सागर/दि.04-01-2017/18-04 वाजता









 चिखलदरा पर्यटन महोत्सवात यंदा आठवडाभराची मेजवाणी
* फेब्रुवारीच्या  12 ते 18 दरम्यान होणार महोत्सव
पालकमंत्री प्रविण पोटे यांनी घेतला आढावा
        अमरावती, दि. 03 : चिखलदरा पर्यटन महोत्सव हा तीन दिवसाऐवजी आठवडाभराचा करावा व यामध्ये स्थानिक कलावंताचा सहभाग घ्यावा अश्या सुचना  पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज दिल्या. यामुळे पर्यटकांना यावर्षी आठवडाभर सास्कृंतीक कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार आहे.
               
        जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चिखलदरा महोत्सवाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रभुदास भिलावेकर , नगर परिषद चिखलदऱ्याचे अध्यक्ष राजेंद्रसिह सोमवंशी,  जिल्हाधिकारी किरण गित्ते,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी  व इतर अधिकारी उपस्थित होते.
            अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी यांनी या पुर्वीच्या झालेल्या बैठकांची माहिती यावेळी दिली.  महोत्सव आयोजनाचा कालावधी 12 ते 18 फेब्रुवारी राहणार असुन पर्यटनमंत्री व इतरांना यासाठी आमंत्रित करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.महोत्सवादरम्यान खादय महोत्सव, साहसी खेळांचे आयेाजन ,मेळघाटातील जैवविविधतेवर आधारीत छायाचित्रप्रदर्शनी समावेश असणार आहे.महोत्सवासाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही पालकमंत्रयानी दिली.
 गेल्यावर्षी महोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या फेसबुक पेजला 75 लाख हिटस मिळाल्या होत्या. यावेळी महोत्सवाची राज्यस्तरावर चांगली प्रसिध्दी करण्याच्या सुचना पालकमंत्रयानी दिल्या.महाराष्ट्र पर्यटन्‍ विकास महामंडळाने पुढाकार  घेउन पर्यटकांना महोत्सवाकडे प्रोत्सहीत करावे अश्या सुचना जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिल्या.शेगाव , अमरावती, नागपुर या ठिकाणावरुन चिखलदरा येथे येण्यासाठी बसेस उपलब्ध करुन देण्याचाही मुददयावर चर्चा झाली.महोत्सवासाठी वन विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश  पालकमंत्रयानी दिले.

00000000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...