राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रतिज्ञा
अमरावती, दि. 24 : ‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली.
मतदार यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनीचे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी शरद पाटील यांच्यासह सह अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतदारांसाठी प्रतिज्ञा
“ भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याव्दारे, प्रतिज्ञा करतो की, आल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करुन आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्व वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.’’
|
00000
Comments
Post a Comment