ठेवीदारांच्या संरक्षणासाठी
एम.पी.आय.डी. कायद्यात बदल करणार
- मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई, दि. 20 : राज्यात वित्तीय संस्थांमध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांचे संरक्षणासाठी राज्याने केलेल्या कायद्यात तरतूद करण्यात येणार असून याच अधिवेशनात पुढील आठवड्यात विधेयक आणण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य प्रणिती शिंदे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, वित्तीय आमिष दाखवून सामान्यांच्या फसवणूक होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यासाठी एम.पी.आय.डी. कायदा करण्यात आला आहे. मात्र या कायद्यात तरतूद करुन ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी कायद्यात बदल करण्यात येईल. भविष्यात अशा घटनांमधून सामान्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जाणीवजागृती करणे आवश्यक असून त्यासाठी महत्त्वपूर्ण मोहिम हाती घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री सुभाष साबणे, श्रीमती मेधा कुलकर्णी यांनी भाग घेतला.
००००
Comments
Post a Comment