खनिकर्म विभाग; ई-निवीदेस 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
खनिकर्म विभाग; ई-निवीदेस 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 6 : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अचलपूर,
चांदूरबाजार व धामणगाव रेल्वे तालुक्यातील नदीपात्रातील गाळ व गाळ मिश्रीत वाळू,
वाळूडेपोपर्यंत वाहतुक व डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निवीदा
मागविण्यात आली होती. या ई-निविदा सूचनेला मंगळवार दि. 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
देण्यात आली असून याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुरज
वाघमारे यांनी केले आहे.
अमरावती जिल्ह्यात
पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या अचलपूर, चांदूरबाजार व धामणगाव रेल्वे तालुक्यातील
नदीपात्रातील स्थळांतुन गाळ व गाळ मिश्रीत वाळूची, वाळूडेपो पर्यंत वाहतुक करणे व
डेपो निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठी ई-निवीदा सुचना प्रसिध्द करण्यात आली
होती. निवीदा स्विकारण्याची अंतिम दि. 5 सप्टेंबरपर्यंत होती. त्यानुसार 4
क्षेत्रांपैकी फक्त मौजे दिघी महल्ले तालुका धामणगाव रेल्वे येथे निवीदा प्राप्त
झाले असूनउर्वरित 3 क्षेत्रांसाठी एकही निवीदा प्राप्त झालेली नाही. तथापि मौजे
दिघी महल्ले ता. धामणगाव रेल्वे या क्षेत्राव्यतिरिक्त इतर 3 ई-निवीदेस दि. 12
सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रथम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याची
संबंधितांनी नोंद घ्यावी.
00000
Comments
Post a Comment