स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रम
जिल्ह्यात
14 अमृत कलशांची निर्मिती
अमरावती, दि. 21: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या
सांगता कार्यक्रमाच्या अनुषंगाने, 'माझी माती माझा देश' अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील
सर्व 841 ग्रामपंचायती, सर्व 14 पंचायत समिती तसेच सर्व शासकीय कार्यालयामध्ये शासनाच्या
निर्देशानुसार विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
दि.
1 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत गावनिहाय मातीचे कलश तयार करण्यात येत असून तालुक्यातील
सर्व गावांमधून माती गोळा करून पंचायत समिती
स्तरावर संकलित करण्यात येत आहेत. तालुक्याचा
एक अमृत कलश याप्रमाणे 14 अमृत कलश तयार करण्यात येत आहेत. नुकतेच पंचायत समिती ,वरूड
येथे तालुकास्तरावर अमृत कलश तयार करण्यात आला. यामध्ये तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी
यांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ, स्वच्छता शपथ घेऊन अमृत कलश तयार करण्यात आला.
जिल्ह्यातील
1023 गावांमधून मिट्टीगान, संगीत, वाद्य वाजवून उत्सवाचे वातावरणात अमृत कलश तयार करण्यासाठी
माती गोळा करण्यात आली आहे. ग्रामपंचायत पिंपरी
निपानी, ता. नांदगांव खंडेश्वर येथे आज अमृत कलश तयार करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. नांदगांव
खंडेश्वर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात
प्रत्येक गावामधून माती गोळा करून तालुकास्तरावर प्रत्येकी एक अमृत कलश तयार करण्याचे
काम प्रगतीपथावर आहे. तालुकास्तरावर शहीद व
वीर यांच्या कुटुंबाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासनाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम
राबवून अमृत कलश तयार करण्यात येत आहेत.
00000
No comments:
Post a Comment