Monday, December 18, 2023

सुरक्षा रक्षक मंडळाकडून आयोजित भरती प्रक्रिया रद्द

 सुरक्षा रक्षक मंडळाकडून आयोजित भरती प्रक्रिया रद्द

अमरावती, दि. 18 (जिमाका) : उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत सुरक्षा रक्षक मंडळाने समुच्चय पुल तयार करण्यासाठी शासन नियमाप्रमाणे तसेच योजनेतील तरतूदीनुसार भरती प्रक्रिया राबवून उमेदवाराचा निकाल तथा प्रतिक्षायादी जाहीर करण्यासाठी मंडळाने शासनास प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास प्रशासनाने मंडळाद्वारे कायदेशिर बाबीची पूर्तता न केल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करुन नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तथा सहायक कामगार आयुक्त  अध्यक्ष यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 अन्वये अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, योजना दि. 21 फेब्रुवारी 2012 नुसार हे मंडळ स्थापीत असून मंडळामार्फत सरकारी, निमसरकारी, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाने व खाजगी आस्थापना येथे नोंदीत सुरक्षा रक्षकांचा नियमानुसार व आस्थापनेच्या मागणीनुसार पुरवठा करण्यात येते. मंडळाचे कार्यक्षेत्र पाच जिल्ह्याचे असून अमरावती येथील मुख्य कार्यालयातून पाचही जिल्ह्याचे कामकाज करण्यात येते. 

*****

 

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...