Wednesday, December 27, 2023

अभय योजनेंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना; योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार:योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अभय योजनेंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना;

 योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार:योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 27 (जिमाका): मालमत्तेचे हस्तांतरण करतांना नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी  अभय योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व दंड माफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला टप्पा  दि. 1 डिसेंबर 2023 ते दि.31 जानेवारी 2024 आणि दुसरा टप्पा दि. 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा  मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांनी केले आहे.

अभय योजनेंतर्गत पहिल्या टप्पात सन 1980 ते 2000 या कालावधीत नोंदणीसाठी दाखल केलेले अथवा न केलेले दस्ताकरीता दि. 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम रूपये 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपुर्ण रक्कम माफ केली आहे. देय होणारी रक्कम 1 लाख रुपयेवरील असल्यास 50 टक्के व दंडाच्या रक्कमेत संपुर्णत: 100 टक्के सुट देण्यात आली आहे. तर योजनेचा दुसऱ्या टप्पा कालावधीत दि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या काळात मुद्रांक शुल्क व दंड भरणा केल्यास देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडात 80 टक्के सवलत दिलेली आहे. देय होणारी रक्कम 1 लाखावरील असल्यास मुद्रांक शुल्कात 40 टक्के व दंडात 70 टक्के सवलत दिलेली आहे.

 

          पहिल्या टप्प्यात दि. 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीतील भरणा केल्यास देय होणारी रक्कम 1 ते 25 कोटी रुपये पर्यंतच्या असल्यास मुद्रांक शुल्कास 25 टक्के माफी व देय होणारी दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा कमी असल्यास दंड रक्कमेस 90 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम ही 25 कोटी पेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कास 20 टक्के व दंड रक्कम एक कोटी स्विकारण्यात येईल व उर्वरीत रक्कमेस सुट देण्यात येईल. दुसऱ्या टप्पा दि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत या कालावधीत भरणा केल्यास देय होणारी रक्कम 1 ते 25 कोटी रुपये असल्यास देय होणारी मुद्रांक शुल्कातुन सुट 20 टक्के देय राहील. तसेच दंड रक्कमेस 50 लक्ष पेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या मुद्रांक शुल्कातुन सुट 20 टक्के देय राहील. तसेच दंड रक्कम 50 लक्षा पेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या दंडामध्ये 80 टक्के सुट देण्यात येईल. दंडाची रक्कमेची पन्नास लाख पेक्षा जास्त असल्यास केवळ 50 लाख दंड म्हणून स्विकारण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात रक्कम 25 कोटीपेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कात 10 टक्के सुट व दंडात दोन कोटी रुपये रक्कम दंड म्हणुन स्विकारण्यात येईल व उर्वरीत दंडाच्या रक्कमेत सुट देण्यात येईल.

          अभय योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ज्यांना मुद्रांक शुल्काची नोटीस प्राप्त झाली आहे, तसेच ज्यांनी त्यांचे अनोंदणीकृत दस्तऐवजांवर आवश्यक मुद्रांक शुल्क शासनास अदा केले नसेल अशाना या कालावधीतील सर्व दस्तऐवजांना ही सवलत लागू राहिल. त्यामुळे संबंधित पक्षकार यांनी त्यांचे मुळ दस्तांसह विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावा. तसेच शासनाने जाहीर केलेल्या या सवलत  योजनेचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...