Sunday, September 30, 2018

सूर्यगंगा नदीवरील पुलाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
            रस्ते व पायाभूत सुविधांतून विकासाला चालना                                            - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
अमरावती, दि. 30 : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला रस्तेविकासासाठी मोठा निधी मिळाला असून अनेक कामे सुरू झाली आहेत. भरभक्कम पायाभूत सुविधांतून विकासाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे,  असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले. 
तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार या गावाजवळून वाहणाऱ्या सूर्यगंगा नदीवरील उंच पुलाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार यशोमती ठाकूर,भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिधडे चौधरी, केंद्र शासनाच्या गंगा पुनर्जीवन प्रकल्पाचे सल्लागार सुधीर दिवे,  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सचिव मनोज वाडेकर, सा. बां.  विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवी आदी उपस्थित होते. शेंदुरजना येथे 11 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीतून मोठा पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल 6 मीटर उंच, 12 मीटर रुंद व 120 मीटर लांब असेल. हे बांधकाम जून 2019 पूर्वी पूर्ण करण्यात येईल. 
पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, शेंदूरजना या संत अच्युत महाराज यांच्या कर्मभूमीत आज पुलाचे काम सुरु होत आहे. याचप्रकारे संपूर्ण राज्यात रस्ते, पूल आणि विविध पायाभूत सुविधांची निर्मिती सुरु आहे. केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी राज्याला मोठा निधी मिळवून दिला आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात 20 हजार 500 कोटी रुपये इतका मोठा निधी येऊन अनेक कामे पूर्णत्वास जात आहेत. यातून अधिक प्रभावी विकास साधणे शक्य होणार आहे. शेंदुरजना गावाचे सुपुत्र मनोज वाडेकर यांनी या पुलाचे काम मार्गी लागण्यासाठी महत्वाचे प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी आणि इतर व्यक्त्यांनीही त्यांचे कौतुक केले.
  
      संत अच्युत महाराज कर्मभूमी विकास आराखडा व नमामी वसिष्ठा प्रकल्प राबविण्याची गरज श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केली. श्री. साळवे यांनी प्रास्ताविक केले.  सरपंच सागर बोडके यांनी आभार मानले. 

  
 
                    
शेंदुरजना येथील यापूर्वीचा पूल 1948 मध्ये उभारण्यात आला होता. तो बसका व पावसाळ्यात त्यावरून पाणी वाहत असल्याने उंच पूल निर्माण करण्याची नागरिकांची मागणी होती. ती लक्षात घेऊन पुलासाठी केंद्रीय मार्ग निधीतून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात आला. तिवसा, कुऱ्हा, अंजनसिंगी, धामणगाव रेल्वे, यवतमाळ या मार्गावरील वाहतूकीला पुलाचा फायदा होणार आहे.

000





Saturday, September 29, 2018

‘आपले शासन, आपल्या योजना’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन



          अमरावती, दि. 29 : जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या ‘आपले शासन, आपल्या योजना’ या घडिपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्याहस्ते आज येथे झाले.
          नगरसेवक सचिन रासने, राजेश साहू, राधाताई कुरील, राजू कुरील, डॉ.प्रणय कुलकर्णी, पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव अनिल भटकर, राजेश बोबडे व जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार उपस्थित होते.
          पुस्तिकेत प्रधानमंत्री आवास योजना, मातृवंदना योजना, सुरक्षित मातृत्व अभियान, कृषी स्वावलंबन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना यासह अनेक महत्वाच्या लोकोपयोगी योजनांची उपयुक्त माहिती समाविष्ट आहे. जिल्हाभरात त्याचे वितरण करण्यात येईल, असे श्री. पवार यावेळी म्हणाले.
00000

आय.ई.टी.ई. च्या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन संशोधनाची परंपरा उन्नत करणारा उपक्रम - केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर






          अमरावती, दि. 29 : ज्ञान व संशोधनाची मोठी परंपरा भारतभूमीला लाभली आहे. ही परंपरा आय.ई.टी.ई. परिषदेसारख्या उपक्रमांतून उन्नत होईल, असे केंद्रिय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे सांगितले.
 आय.ई.टी.ई. च्या (द इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स) 61 व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन केंद्रिय गृहराज्यमंत्री श्री. अहिर यांच्याहस्ते येथील प्रा.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीही हा महत्वाचा कार्यक्रम अमरावतीत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
 संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रेड्डी, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, युवराजसिंग चौधरी, नितीन हिवसे, अॅड. उदय देशमुख, गजानन काळे, रागिणीताई देशमुख, डॉ. चौधरी, डॉ. हुडा, डॉ. प्रशांत इंगोले, डॉ. अमोल बोडखे, डॉ. एम. एस. अली आदी उपस्थित होते. या परिषदेत चांद्रयान मोहिमेसह अनेक महत्वाच्या प्रकल्पातील संशोधक सहभागी झाले आहेत.
श्री.अहिर म्हणाले की, संशोधन हे देशाला पुढे नेत असते. त्यामुळे संशोधनाला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांतून देश व समाजाचे हित साधले जाते. आविष्कार व संशोधनाची परंपरा परिषदेने समृद्ध केली आहे.
          डॉ. हुडा, पद्मश्री ले. कर्नल दिवाकर सेन, डॉ. टी. एस. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. पद्मश्री डॉ. टी हनुमान चौधरी व आर. के. गुप्ता, के. लक्ष्मीनारायण, डॉ. एन. एच. कोरी यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निकु खालसा व प्रा. मैथीली देशमुख यांनी केले.
00000
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात सुमारे पावणेसातशे निवेदने दाखल
नागरिकांच्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही व्हावी
                                       -पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

      अमरावती, दि. 29 :  स्वच्छतेचा प्रश्न नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असून, त्याबाबत काटेकोर कामे झाली पाहिजेत. शहरातील एकही परिसर अस्वच्छ राहता कामा नये. जनता दरबारात नागरिकांनी दिलेल्या निवेदनांवर तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.
            शहरात साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा व विविध विभागांची बैठक पालकमंत्र्यांनी नुकतीच घेतली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दिवसभर शहरात स्वच्छता कामांची पाहणी करून कार्यवाहीबाबत निर्देश दिले होते आणि आपल्या परिसरातील तक्रारी जनता दरबारातून दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जनता दरबारात लेखी निवेदनांद्वारे सुमारे 400, तर दूरध्वनीद्वारे 272 निवेदने दाखल झाली.
आज सकाळपासूनच पालकमंत्र्यांच्या इर्विन चौक स्थित जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  शहरातील अनेक नगरसेवक, आयुक्त संजय निपाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नैताम यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी जनता दरबारात संपूर्ण दिवसभर अथकपणे निवेदने स्वीकारत नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या, तसेच प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.  
पालकमंत्री पोटे पाटील म्हणाले की, स्वच्छतेचा मुद्दा थेट आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे नगरसेवक व नागरिकांच्या मागणीनुसार संपूर्ण शहरातील स्वच्छतेबाबत प्रत्यक्ष पाहणीतून आढावा घेतला. प्रशासन लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत नाही, तसेच नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर असल्याने संपूर्ण आढावा घेतला. त्याचा शहरात काही प्रमाणात निश्चित सुयोग्य परिणाम दिसून आला. कचरा उचलण्याचे प्रमाण वाढले आहे.
            महापालिकेत स्वच्छतेची कामे करणारे बहुतेक कंत्राटदारी कर्मचारी आहेत. स्वच्छतेचा प्रश्न थेट आरोग्याशी निगडित असल्याने कायमस्वरूपी कर्मचारी असले पाहिजेत. प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार कामे केली पाहिजेत. कुणाही व्यक्तीचा शहरातील अस्वच्छतेमुळे पसरलेल्या आजाराने मृत्यू झाल्याची तक्रार आली तर त्यासंबंधी जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
                                               


                                      पालकमंत्र्यांकडून नागरिकांना आवाहन
     अमरावती जिल्हा ही जगाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांची भूमी आहे. जिल्ह्याचा हा लौकिक राखण्याची व वाढविण्याची जबाबदारी प्रशासनाची व नागरिकांची आहे. त्यामुळे विविध क्षेत्र काम करणारे नागरिक, शहरातील विक्रेते, दुकानदार, उपाहारगृहचालक आदींनी शहराची स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेसारखा राज्यव्यापी कार्यक्रम राबविला आहे. शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कचरा कचरापेटीतच टाकणे आदी शिस्त सर्वांनीच पाळली पाहिजे, असेही ते म्हणाले.

                                                            ०००



Friday, September 28, 2018

शिर्डी श्री साईबाबा विश्वस्त संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींचा धनादेश


मुंबईदि. 28 : शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज पाच कोटींचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपुर्द केला.
यावेळी जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदेसामान्य प्रशासन राज्य मंत्री मदन येरावारमुख्य सचिव दिनेशकुमार जैनमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणीसंस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
0 0 0

Thursday, September 27, 2018

स्टार्टअप इडिंया - महाराष्ट्र यात्रेचा 3 ऑक्टोबर रोजी शुभारंभ उपक्रमादरम्यान 10 जिल्ह्यात शिबीर तर 23 शहरांमध्ये स्टार्टअप व्हॅन थांबणार



नवी दिल्ली, 27 नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया - महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ 3 ऑक्टोबर रोजी  राजभवन, मुंबई येथून  होणार आहे. यातंर्गत 10 जिल्ह्यांमध्ये शिबीर आयोजित करण्यात येतील तर 23 शहरांमध्ये  स्टार्टअप व्हॅन थांबणार आहे.
            महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु आणि महाराष्ट्राचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ  होणार आहे.
स्टार्टअप इंडिया - महाराष्ट्र यात्रेचे आयोजन केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसेच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
स्टार्टअप इंडियाच्या पुढाकाराने देशातील छोटया जिल्ह्यांमधील नवउद्योजक प्रतिभेला शोधने हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. नवउद्योजकांना तसेच उद्योग क्षेत्रात भविष्य करू इच्छिणा-यांना आवश्यक मार्गदर्शन, सुविधा प्रदान करून देणेही या यात्रे मागचा मानस आहे.
नाविण्यपूर्ण कल्पना घेऊन येणा-या व्यक्तींसाठी आणि स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनी युक्त सुसज्ज व्हॅन स्टार्टअप इंडिया यात्रेत असणार आहे.  ही व्हॅन 16 जिल्ह्यांतून 23 शहरांमधून जाणार असून 3 नोव्हेंबरला नागपूर येथे पोहोचणार आहे. नागपूर येथे भव्य समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या दरम्यान 10 ठिकाणी शिबीर आयोजित केले जातील, जिथे स्टार्टअप इंडिया आणि महाराष्ट्र स्टार्टअप धोरण यावर सादरीकरण केले जाईल.
या यात्रेत सहभागी होण्यासाठी www.startupindia.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
10 जिल्ह्यांमध्ये शिबीर आयोजित
मराठवाडा विभागात औरंगाबाद, बीड आणि हिंगोली येथे, पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर येथे विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, अकोला तर कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
यात्रे दरम्यान 23 शहरांमध्ये स्टार्टअप व्हॅन थांबणार
स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रे दरम्यान राज्यातील 23 शहरांमध्ये स्टार्टअप  व्हॅन थांबणार आहे. यामध्ये पालघर, कल्याण, वेंर्गुला, मालवण, राजापूर, कुडाळ, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, शिर्डी, मालेगाव, धुळे, जळगाव, बीड, नांदेड, यवतमाळ, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ही शहरे आहेत.

महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप  यात्रे दरम्यान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत .

अ.क्र.
दिनांक
शहर
1.
15 ऑक्टोंबर 2018
औरंगाबाद
2.
16 ऑक्टोंबर 2018
बिड
3.
18 ऑक्टोंबर 2018
सोलापूर
4.
20 ऑक्टोंबर 2018
सिंधूदूर्ग
5.
22 ऑक्टोंबर 2018
रत्नागिरी
6.
24 ऑक्टोंबर 2018
पुणे
7.
26 ऑक्टोंबर 2018
हिंगोली
8.
27 ऑक्टोंबर 2018
अकोला
9.
29 ऑक्टोंबर 2018
चंद्रपूर
10.
31 ऑक्टोंबर 2018
नागपूर

23 ठिकाणी स्टार्टअप यात्रेची व्हॅन थांबणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

अ.क्र.
दिनांक
शहर
1.
04 ऑक्टोंबर 2018
पालघर
2.
04 ऑक्टोंबर 2018
कल्याण
3.
06 ऑक्टोंबर 2018
वेंर्गुला
4.
06 ऑक्टोंबर 2018
मालवण
5.
08 ऑक्टोंबर 2018
राजापूर
6.
08 ऑक्टोंबर 2018
कुडाळ
7.
09 ऑक्टोंबर 2018
कोल्हापूर
8.
09 ऑक्टोंबर 2018
सांगली
9.
10 ऑक्टोंबर 2018
पुणे
10.
11 ऑक्टोंबर 2018
अहमदनगर
11.
12 ऑक्टोंबर 2018
औरंगाबाद
12.
12 ऑक्टोंबर 2018
शिर्डी
13.
13 ऑक्टोंबर 2018
मालेगाव
14.
13 ऑक्टोंबर 2018
धुळे
15.
15 ऑक्टोंबर 2018
जळगाव
16.
16 ऑक्टोंबर 2018
बीड
17.
17 ऑक्टोंबर 2018
नांदेड
18.
19 ऑक्टोंबर 2018
यवतमाळ
19.
19 ऑक्टोंबर 2018
अमरावती
20.
20 ऑक्टोंबर 2018
भंडारा
21.
22 ऑक्टोंबर 2018
चंद्रपूर
22.
22 ऑक्टोंबर 2018
गडचिरोली
23.
23 ऑक्टोंबर 2018
नागपूर


DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...