मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 च्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण
येत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 24 : देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 च्या 33.5 किमी लांबीच्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 या ठिकाणी झाले. यावेळी कोस्टल रोडसी लिंकमेट्रो आदी प्रकल्पांमुळे येत्या 3 वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार असून एक आधुनिक शहर म्हणून पुढील काळात मुंबई पहायला मिळेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
मुंबई मेट्रो 3 पॅकेज 7 मधील 1.26 किमी इतके भुयारीकरण आज पूर्ण झाले. या भुयारीकरणाच्या कामाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.
मुंबईकरांच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडविण्यासाठी राज्य शासनाने मेट्रो चे विस्तृत जाळे उभे करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील मेट्रो 3 या महत्वाच्या मार्गिकेतील पहिल्या भुयारी टप्प्याच्या अनावरण सोहळ्याचे साक्षीदार होताना मला विशेष आनंद होत आहे. ही चांगली सुरूवात असून आणखी खूप मोठे काम करायचे आहे. मेट्रो ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरक्षितआरामदायी अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळणार असून भुयारी मेट्रोला एलिव्हेटेड मेट्रोने जोडल्यानंतर सार्वजिक वाहतुकीचे इंटिग्रेशन होऊन नागरिकांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
मुंबईला शांघाय करण्याचे बोलले जात आहे. मात्रआम्ही मुंबईला आधुनिक शहर म्हणून उभे करणार असून शांघायमधील नागरिकही 21 व्या शतकातील अतिशय चांगले शहर म्हणून मुंबई पहायला येतीलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
श्री. फडणवीस म्हणालेमुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारून सर्वांसाठी एकच तिकिट प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यासाठी मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेले प्लॅटफॉर्म उत्तम असून निती आयोगाची टिम ते पाहण्यासाठी येणार आहे. त्यानंतर संपूर्ण देशात ही प्रणाली लागू होऊ शकते.
            राज्य शासनाने आखलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आता प्रत्यक्षात सुरू होत आहे. एलिव्हेटेड रेल्वेचे कामही जोमाने सुरू झाले आहे. येत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदलेल,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटीलआमदार पराग अळवणीएमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीवअतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडेचीनचे कौन्सिल जनरल तांग गुओईजिल्हाधिकारी शिवाजी जोंधळेमुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडेएल अँड टीचे एस.के. देसाईस्टेकचे सु चांग आदी उपस्थित होते.
एमएमआरसीच्या व्यवस्थापकीयय संचालक श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्यामुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देऊन हा यशाचा टप्पा गाठला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रभावी नेतृत्वमुख्यमंत्री कार्यालयातील वॉररूमचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनसर्व भागधारकआणि मुंबईकर नागरिकांचा भक्कम पाठिंबा आणि सहकार्य यामुळे मुंबई मेट्रो 3 च्या टीमला प्रकल्पातील अडथळे पार करून,या महाप्रकल्पाचे स्वप्न वेळेत पूर्ण करण्याची प्रेरणा वेळोवेळी मिळत आहे.

मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये
·         मुंबई शहराचा भूगर्भ बेसाल्टब्रेशिया तसेच टुफ अशा प्रकारच्या कठीण खडकांचा असून त्यांना भेदत भुयारीकरण करूनन 'वैनगंगा 1' या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) काम केले आहे.
·         वैनगंगा 1 या टनेल बोअरिंग मशीनने 259 दिवसात 1.26 किमीचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करून एक इतिहास रचला आहे.
·         शांघाय टनेलिंग इंजिनीयरिंग कंपनीने हे टनेल बोअरिंग मशिन तयार केले आहे. 
·         हे टीबीएम 92 मी लांबीचे असून प्रतिदिन 4.6 मी इतक्या वेगाने भुयारीकरण करते.
·         या मशीनने सध्या कार्यरत असलेली मेट्रो लाईन 1 आणि सहार उन्नत मार्ग यासारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून भुयारीकरण केले आहे.
·         250 निष्णात अभियंतेतंत्रज्ञ आणि कुशल कामगार यांनी सातत्यपूर्ण मेहनत घेतली
·         मुंबई मेट्रो3 चे पॅकेज 7 मरोळ नाका येथे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 आणि जेव्हीएलआर येथे स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी मेट्रो 6 यांना जोडणार
·         तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेने न जोडली गेलेली एमआयडीसीसीप्झ यासारखी महत्वाची औद्योगिक आणि रोजगार केंद्रेही जोडली जाणार
·         मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पूर्ण प्रकल्पातील सुमारे 9 किमी इतके भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
·         19,40,2544 क्यु मी इतक्या मातीचे उत्खनन
·         पॅकेज 7 चे हे काम एल अँड टी आणि शांघाय इंजिनियरिंग कंपनी संयुक्त भागीदारीत करत आहेत
·         पॅकेज 7 मधील भुयारीकरणचा हा टप्पा 7.07 किमी इतका असून त्यातून एकूण 11 लाख क्यू मी इतकी माती उत्खनित होणार.
·         ही माती तळवली पिसे येथे निर्धारित शासकीय जागेत टाकली जाणार
·         आतापर्यंत 2.5 लाख क्यु मी इतकी माती उत्खनित


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती