सामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी डिजीटल राहुटी उपक्रम राबविणार - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू


 

अमरावती, दि.  1 : सामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी गावोगाव राहुटी उपक्रम यापूर्वी राबविण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात लक्षात घेऊन आता डिजीटल राहुटी उपक्रम राबविणार असल्याचे जलसंपदा, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सांगितले.

            सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राहुटीच्या माध्यमातून विविध विभागांशी निगडित समस्यांचे निराकरण केले जाते. राज्यमंत्री महोदय स्वत: उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारतात. संबंधित विभागाच्या तक्रारीचे लगेच निराकरण केले जाते. विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी विविध योजनांच्या माहितीसह स्वतंत्र कक्षात उपस्थित असतात. त्यामुळे राहुटी उपक्रमातून हजारो नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण होते.

याच अनुषंगाने आता डिजीटल राहुटीचा उपक्रम राबविण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात येत आहे. त्याद्वारे पाच-सहा गावे मिळून एका मध्यवर्ती गावातील ग्रामपंचायतीत व्हिडीओ कॉन्फरन्स हॉल तयार करण्यात येईल. तिथे नागरिकांना आपली समस्या त्या ठिकाणी उपस्थित राहून मांडता येईल. कृषी, ग्रामविकास, महसूल आदी विभागातील स्थानिक अधिकारी व कर्मचारी  उपस्थित राहून या नागरिकांना समस्या मांडण्यासाठी सहायय् करतील. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी अधिकारीही त्यांच्या कार्यालयातून कनेक्ट होतील. आरोग्य सुरक्षिततेसाठी योग्य ती दक्षता घेतली जाईल.

नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्यमंत्री श्री. कडू यांनी व्यक्त केला.

00000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती