Monday, April 23, 2018

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट  
मुंबई, दि. 23 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात  सार्वजनिक शिधा वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण’ या विषयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट आणि या विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि.24 एप्रिल रोजी संध्याकाळी7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            शिधा वितरण प्रणालीचे संगणकीकरणशिधापत्रिकाचे डिजिटायजेशन व आधार लिंकिंगई -पॉस मशिनके. वाय. सी सुविधामहिला बचतगटांना शिधा वितरण केंद्रांचे वाटप,दुकानदारांसाठी थेट द्वारपोच योजना तसेच बोगस शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येणारी मोहीम याबाबतची सविस्तर माहिती श्री. बापट आणि श्री. पाठक यांनी  जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...