‘किसान सन्मान’च्या लाभार्थ्यांनी 7 सप्टेंबरपूर्वी ई- केवायसी पूर्ण करावी - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

‘किसान सन्मान’च्या लाभार्थ्यांनी 7 सप्टेंबरपूर्वी  ई- केवायसी पूर्ण करावी

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

            अमरावती, दि. 2 : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक आहे.ई- केवासी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे  संबंधितांनी ती दि.7 सप्टेंबरपूर्वी  पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

             मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखालील बैठकीत  ई-केवायसी पूर्ण करण्यास दि. 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी ही प्रक्रीया पूर्ण केली नाही त्यांना पुढील हप्ताचा लाभ मिळणार नाही. ई-केवासी मिळण्यासाठी  सीएससी केंद्राशी संपर्क साधून, तसेच pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नर- ई-केवायसी न्यू  हा पर्याय निवडून ओटीपीव्दारे नोंद  करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.

बँक खात्यासोबत आधार संलग्न करण्यासाठी लाभार्थ्यांनी बँकेशी संपर्क साधून  आधार व बँक खाते जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. त्याचप्रमाणे ई-केवासी करतांना कुठलीही अडचण आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोलरूमशी (0721-2662025) संपर्क साधावा.

                सर्व  तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी ई-केवासी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी.  लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया दि. 7 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी  केले.

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती