Thursday, November 30, 2023

विकसित भारत संकल्प यात्रेचा अंजनगाव बारी येथून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ;प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे लाईव्ह प्रक्षेपण

 












विकसित भारत संकल्प यात्रेचा अंजनगाव बारी येथून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ;प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे लाईव्ह प्रक्षेपण

अमरावती, दि.30(जिमाका) : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम दि. 26 जानेवारीपर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शासनाच्या योजनाची माहिती देणारे प्रसिद्धीरथाचे अंजनगाव बारी ग्रामपंचायत येथून खासदार डॉ. अनिल बोंडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या उपस्थितीत आज शुभारंभ झाला. ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ कार्यक्रमांतर्गत दुरदृष्य प्रणालीव्दारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे यावेळी लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी अंजनगाव बारी येथील ग्रामस्थांचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला दि. 23 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व तालुकास्तरावर प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ हा कार्यक्रमांतर्गत अंजनगाव बारी येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. सरपंच श्रीमती शोभाताई खडसे, उपसरपंच जगदीश अंबाळकर, ग्रामसेवक विनोद इसाळ तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे प्रमुख बाळासाहेब बायस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी,  गटविकास अधिकारी प्रफुल्ल बोरकांडे, तहसीलदार विजय लोखंडे तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

            खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, केंद्र शासनाच्या फ्लॅगशीप योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असून त्यामुळे लाभार्थ्यांचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचावत आहे. केंद्र शासनाच्या घरकुल योजनामुळे गरीबांना पक्के घर मिळाले असून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावत आहे. तसेच आयुष्मान भारत योजनामुळे गरजूवर पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार केले जात आहेत. यामुळे गरीबांच्या आजारावरील होणारा खर्चाची बचत होवून त्यांना आर्थिक सहाय्य होत आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनामुळे समाजातील प्रत्येक घटकांचा विकास होत असून लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित देश म्हणून भारत देश नावलौकिक मिळवेल. विकसीत भारत संकल्पपूर्तीसाठी सर्व शासकीय यंत्रणानी शेवटच्या घटकापर्यंत योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा म्हणाले की, यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या 17 महत्त्वाकांक्षी योजनांची सविस्तर माहिती असलेले चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील ग्राम व तालुकास्तरावर व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहेत. तसेच नागरिकांकडून निवेदनही स्वीकारले जात आहे. या प्रचाररथाच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध योजना लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

 

अंजनगाव बारी येथील रहिवासी फातिमा सलीम यांनी विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांच्या झालेल्या लाभाबाबत माहिती दिली. त्यानंतर लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत गोल्ड कार्ड व जलजीवन मिशनचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांच्या योजनांची माहिती  देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. मा.पंतप्रधान यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश सर्वांना यावेळी ऐकविण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे केंद्र शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या लाभाविषयी अनुभव जाणून घेतले. योजनाची माहिती इतर वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन प्रधानमंत्री यांनी यावेळी केले. फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशात प्रचार व प्रसिद्धी करीत आहे. या यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री यांनी केले.

यात्रेचा 6 डिसेंबरपर्यंतचा नियोजित कार्यक्रम

            विकसित भारत संकल्प यात्रा दि. 30 नोव्हेंबर रोजी अमरावती  तालुक्यातील अजंनगाव बारी व नांदुरा बु., तिवसा येथील बोरडा व भारवाडी, चांदुर रेल्वे येथील मालखेड व लालखेड, मोर्शी येथील अष्टोली व कोलविहीर, अचलपूर येथील कांडली व अंबाडा, दर्यापूर येथील सुकळी व लोथवाडा, धारणी येथील काकरमल व हरीसाल या ठिकाणी भेट देणार आहे.

दि. 1 डिसेंबर रोजी अमरावती तालुक्यातील गोपालपूर व आमला, तिवसा येथील थानाथुनी व सुरवार्डी, चांदुर रेल्वे येथील राजुरा व दहिगाव धावडे, मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर व दोमक, अचलपूर तालुक्यातील कोथरा व सालेपूर, दर्यापूर तालुक्यातील अडुला बाजार व भामोद, धारणी तालुक्यातील मंगीया व जंबू येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.

दि. 2  डिसेंबर रोजी अमरावती तालुक्यातील पुसदा व र्सिला, तिवसा येथील वणी ममदापूर व जावरा, चांदुर रेल्वे येथील धानोरा माहली व पळसखेड, मोर्शी येथील मायावाडी व भाईपूर, अचलपूर येथील पंढरी व मासोना, दर्यापूर येथील दारापूर व चंदिकापूर, धारणी येथील नांदुरी व रानामालूर.

दि. 3 डिसेंबर रोजी, अमरावती तालुक्यातील नया अकोला व वलगाव, तिवसा येथील फत्तेपूर व वरूड, चांदुर रेल्वे येथील कवठा कडु व दिघी कोल्हे, मोर्शी येथील चिंचोली गवाली व चिखल सांवगी, अचलपूर येथील बेलखेडा व वझ्झर, दर्यापूर येथील चांडोली व करतखेडा, धारणी येथील बेरडाबरडा व मांडवा.

दि. 4 डिसेंबर रोजी अमरावती तालुक्यातील कामुंजा व रेवसा, तिवसा येथील दापोरी खुर्द व करजगाव, चांदुर रेल्वे येथील कोहला व सांवगी संगम, मोर्शी येथील डोंगरवाडी व दापोरी, अचलपूर येथील मल्हारा व गहुखेड कुंभी, दर्यापूर येथील धामोदी व सिवर. धारणी येथील झापल व टेंभीली.

 

दि. 5 डिसेंबर रोजी अमरावती तालुक्यातील कुंड सर्जापूर व वनारसी, तिवसा येथील सतरगाव व सर्शी,  चांदुर रेल्वे येथील भिलटेक व सोनारा बु., मोर्शी येथील दाबेरी व ब्रहाणपूर, अचलपूर येथील देवमाली व नारायणपूर, दर्यापूर येथील गेवडी व सिंगवाडी, धारणी येथील बिजूडावाडी व टट्रा.

दि. 6 डिसेंबर रोजी अमरावती तालुक्यातील लोणटेक व मलकापूर, तिवसा येथील शेंदुरजना बा. व अखतवाडा, चांदुर रेल्वे येथील  धानोरा मोगल व टोंगलाबाद, मोर्शी येथील धामणगाव व तळेगाव, अचलपूर येथील भूगाव व जावर्डी, दर्यापूर येथील गोलेगाव व टोंगालाबाद. व धारणी येथील मोगर्डा व टिंटबां या गावांना विकसित भारत संकल्प यात्रा भेट देणार आहे.

000000

Tuesday, November 28, 2023

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 अमरावती, दि. 28 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह, इर्विन दवाखान्याच्या वार्ड क्रं. 6 समोर सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय 50 वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच, समोरील बाजुस टक्कल, दाढी व मिशीचे केस काळे पांढरे वाढलेले, अंगात फुल बाह्याचा कथ्था रंगाचा शर्ट त्यावर लेबल lance असे इंग्रजीत लिहलेले, निळा पँन्ट, डाव्या पायाचे घोट्याला जुन्या माराचे निशान व पंजा सुजलेला आहे. मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष , अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2677001 किंवा पोहेकाँ जुनैद भ्रमणध्वनी क्रं. 9823178186 व पोहेकाँ राजेश भ्रमणध्वनी क्रं. 9923081375 या क्रमांकावर संपर्क साधावा. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती  यांनी केले आहे.

00000

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती; अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी काटेकोर कार्यवाही करा



 

जिल्हास्तरीय अंमली  पदार्थ विरोधी कार्यकारी समिती;

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी काटेकोर कार्यवाही करा

               अमरावती, दि. 28 (जिमाका):  रसायन निर्मिती कारखान्यांतून अंमली पदार्थाचे उत्पादन होऊ नये यासाठी नियमित तपासणी करून त्याबाबत अहवाल सादर करावा. तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थांचा प्रतिबंधासाठी सर्व विभागाने काटेकोर कार्यवाही करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी केले.

            अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून जिल्हास्तरीय अंमली  पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलिस आयुक्तालयात आज बैठक झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासनचे औषध निरीक्षक स्वाती भरडे, तहसिलदार डॉ. प्रशांत पडघन, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अरविंद गभणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

        

         औषध विक्रेत्यांकडून अनेकदा प्रिस्किप्शनशिवाय औषधे दिली जातात. बंदी घातलेल्या औषधांतील काही ठराविक घटक असलेली वेगळी औषधेही निरनिराळ्या नावाखाली उपलब्ध असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होता कामा नये. याबाबत मेडिकल स्टोअर्सची नियमित तपासणी करावी. टपाल विभागाने पार्सल प्राप्त करणाऱ्याची चौकशी करुन व त्या पार्सलमध्ये काय आहे याची तपासणी करुनच संबंधित व्यक्तीला पार्सल सुपूर्द करावे. बंद पडलेल्या कारखान्यांत अनेकदा रात्रीच्या वेळी अवैध उत्पादन निर्मितीचे प्रकार पूर्वी घडले आहेत. तसे घडू नये, यासाठी वेळोवेळी तपासण्या करावे. तसेच कंपनीत कोणत्या पदार्थाचे उत्पादन होते व त्यात काही इतर रसायने मिसळून अंमली पदार्थ तयार होतात का, याची खातरजमा करावी. तसा अहवाल प्रशासनाला सादर करावा.

 

अंमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम,  टपालाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही तसेच जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेणे, व्यसनमुक्ती केंद्रांशी समन्वय राखणे, दाखल झालेल्या व्यक्तींना कोणत्या अंमली पदार्थांचे व्यसन आहे याबाबतची माहिती, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान राबवणे,  पोलीस, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो  व राज्य उत्पादन शुल्क यांनी केलेल्या कारवायांच्या माहितीचा डेटाबेस तयार करणे, अंमली पदार्थांविरुध्द गुन्हे व करावयाची कार्यवाहीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

            

00000

जिल्हा लोकशाही दिन 4 डिसेंबरला

 जिल्हा लोकशाही दिन 4 डिसेंबरला

 

           अमरावती, दि. 28 (जिमाका): जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी जिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी केले आहे.

00000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत महाडीबीटी प्रणालीवर निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करा

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत महाडीबीटी प्रणालीवर

निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करा

 

            अमरावती, दि. 28 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर 14 व्या लॉटरी सायकलमध्ये मोठ्या संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहूल सातपुते यांनी केले आहे.  

 

            जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत आहे. फलोत्पादन पिकाचा संशोधन तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर व्यवस्थापन तंत्रज्ञान, प्रक्रीया व पणन सुविधा यांच्या माध्यमातुन समुह पध्दतीने सर्वागीण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे पारंपारिक उत्पादन पध्दतीचे आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालुन तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे आदी या योजनेचे उदिष्टे आहे.

 

            एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 14 व्या लॉटरी सायकलमध्ये महाडीबीटी प्रणालीवर मोठ्या संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. या नव्याने निवडलेल्या लाभार्थीने नजीकच्या सीएससी सेंटर तसेच संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि आपले आवश्यक कागदपत्रे तात्काळ अपलोड करून घ्यावीत. या योजनेंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील एकूण 1 हजार 900 शेतकऱ्यांचे विविध घटकासाठी निवड झालेली आहे. यात प्रामुख्याने क्षेत्र विस्तार व पुनरूज्जीवन, पॅक हाऊस, कांदाचाळ, शेडनेट हाऊस, प्लॉस्टीक मलचींग इत्यादी मोठ्या संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. तरी नविन निवड झालेल्या लाभार्थीनी आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Saturday, November 25, 2023

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे -जिल्हाधिकारी सौरभ कटियार










मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2024

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

^ जिह्यात विविध ठिकाणी विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन

^ विभागीय आयुक्तांकडून निवडणुक कामकाजांचा आढावा

           अमरावती, दि. 25 : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. त्यासाठी 17 व 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नव मतदारांनी मतदार यादीत त्यांच्या नावाची अवश्य नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील सर्व मतदानकेंद्रात मतदारांच्या नोंदणीसाठी आयोजित विशेष शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

         येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष नोंदणी शिबीराची जिल्हाधिकाऱ्यांनी आज पाहणी करुन विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशिक्षण व विकास प्रबोधिनीचे संचालक तथा समन्वय अधिकारी अजय लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नव मतदारांच्या नोंदणीसाठी 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर दरम्यान विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत 1 जानेवारी 2024, 1 एप्रिल 2024, 1 जुलै 2024 तसेच 1 ऑक्टोंबर 2024 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नव मतदारांनी, विद्यार्थ्यांनी मतदार यादीत त्यांच्या नावाची नोंदणी करावी. तसेच जे मतदार इतर मतदार संघात स्थांनातरित झाले आहे किंवा इतर मतदार संघातून या ठिकाणी आले आहेत, अशांचा शोध घेऊन मतदार यादींचे नुतणीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची तपासणी करावी. काही सुधारणा करावयाची असेल तसे संबंधित मतदान केंद्राधिकारी यांना कळवावे, असेही श्री. कटियार यांनी यावेळी सांगितले.

         पुढे बोलताना ते म्हणाले की, मतदार नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात येत आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. भारत निवडणूक आयोगाव्दारे मतदार नोंदणी व मतदार कार्ड मिळण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमूना 6, नमूना 7 ग्राम, तालुका व जिल्हास्तरावरील सर्व मतदान केंद्रावर व महसूल विभागाच्या निवडणूक शाखेत उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असे श्री. कटियार यांनी सांगितले.

            महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींनी मतदानाचे महत्व इतरांना पटवून देत मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ‘मतदार जनजागृती क्लब’ची स्थापना करावी. ‘मतदार जनजागृती मित्र’ म्हणून याविषयी इतरांना मार्गदर्शन करावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या सादरीकरणातून मतदानाच्या जनजागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

विभागीय आयुक्तांकडून निवडणूक कामकाजाचा आढावा व मतदान केंद्रास भेट

            तत्पूर्वी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत झालेले कामकाज, स्वीप मोहिम, तालुकानिहाय मतदारांची संख्या, मतदान केंद्रे, मतदान जागृती आदीबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून उपरोक्त बाबींची माहिती दिली.

त्यानंतर डॉ. पाण्डेय यांनी बडनेरा मतदार संघातील सामरा हायस्कुल येथील मतदान केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच मतदार नोंदणी, मतदान जनजागृतीबाबत आवश्यक सूचना दिल्या.

00000 

रब्बी हंगामातील पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करावे

 

रब्बी हंगामातील पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत

पाणी अर्ज सादर करावे

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : रब्बी हंगाम सन 2023-24 मध्ये बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घेण्यासाठी पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात अथवा कालवा निरीक्षक अथवा मोजणीदार यांच्याकडे 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन अमरावती मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पां. आडे यांनी केले आहे. 

 

अमरावती मध्यम प्रकल्प विभागातील उपलब्ध पाणी पुरवठ्यानुसार रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज नमुना 7 दोन प्रतीमध्ये विहित कालावधीमध्ये सादर करावा. पाणी मागणी अर्जाचे कोरे नमुने संबंधित उपविभाग शाखा कार्यालय व उपशाखा कार्यालयातून मोफत पुरविण्यात येत आहेत. 

 

शासनाच्या धोरणानुसार धरणातील उपलब्ध पाणी हे उन्हाळा हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात शेती पिकासाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरविण्याचे नियोजन आहे. उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी घ्यावे व सुक्ष्म सिंचनावर भर द्यावा, असे अमरावती मध्यम प्रकल्प विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

 

पाणी मागणी अर्ज करण्यासंबंधी सूचना

 

पाणी मागणी अर्ज करणारा स्वत: शेताचा मालक असावा. कुळ अगर वहीवाटदार असलेल्या शेतीसाठी मागणी अर्जासोबत मालकाचे संमतीपत्र जोडावे. अर्जामध्ये मागणी क्षेत्र पिकवार स्पष्ट नमूद करावे. अर्जावर खातेपुस्तिकेवरुन गाव, सर्वे क्रमांक, पोटहिस्से पिकाचे नाव आणि मागणीक्षेत्र अचूक नोंदवावे. अर्जात पाणीपट्टी, थकबाकीसंबंधी अचूक माहिती द्यावी. अर्जाची पूर्तता कालवा निरीक्षकाकडून तपासून दोन प्रतीत सादर करावे. पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामामध्ये 31 मार्च 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल. प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास इच्छुक शेतकऱ्यांना 15 एप्रिल 2024 पर्यंत त्यांच्या मागणी अर्जानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. 

 

प्रथम पाणी दिल्यानंतर सिंचन केलेल्या पीक क्षेत्राची मोजणी सिंचन शाखेच्या मोजणीदाराकडून करण्यात येईल. शेतकऱ्याच्या शेतातील पाटचारी/शेतचारी सुस्थितीत नसल्यास अशा शेतकऱ्यांचा पाणी अर्ज मंजूर करण्यात येणार नाही. अर्ज मंजूर होताच कालवा निरीक्षकाकडून पाणीपुरवठा संबंधीची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात येईल. कडधान्ये, डाळी, तेलबिया, रब्बी भुसार पिके यांच्यासाठी प्राधान्यक्रमाने पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा करण्यात येईल. रब्बी हंगामासाठी अमरावती मध्यम प्रकल्प विभागांतर्गत मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प, उपसा सिंचन योजना इत्यादी पाठबंधारे प्रकल्पांच्या समादेश क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

00000

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

 

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, परतवाडा मार्फत शासनाव्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणासाठी उमेदवार निवडीसाठी दि. 30 नोव्हेंबर रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी बुधवार दि. 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वैशाली पवार  यांनी केले आहे. 

 

 

प्रशिक्षण कालावधी हा दि. 1 डिसेंबर ते 15 मार्च 2024 पर्यंत साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील हवा. उमेदवाराचे वय 29 नोव्हेंबर 2023 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण असावे. उमेदवार किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद येथे नोंदणी केलेली असावी. इच्छुक उमेदवारांनी दि. 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावा. तसेच अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीसाठी  गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर, कॅम्प परवाडा जि. अमरावती  येथे मुलाखतीसाठी मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. निवड यादी त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.

 

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 07223-221205 तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 7709432024 येथे संपर्क साधावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्णची गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालयात नाव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड इत्यादी आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व अलीकडच्या काळातील छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करु नये.

00000

चांदुर रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथे पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

 

चांदुर रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथे पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

 

            अमरावती, दि. 25 (जिमाका):    चांदुर रेल्वे तालुक्यातील पंचायत समिती सातेफळ निर्वाचन गणाचा पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.

 

कार्यक्रमानुसार, दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पासून करण्यात येईल व छाननीनंतर लगेच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येण्यात येईल. नामनिर्देशनपत्राचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिका-याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अपीलावर सुनावणी व निकाल देण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर आहे.  

 

 

अपील नसलेल्या ठिकाणी दि. ११ डिसेंबर रोजी, तर अपील असलेल्या ठिकाणी दि. १३ डिसेंबर रोजी दु. ३ वा. पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी व निशाणी वाटप अपील नसलेल्या ठिकाणी दि. ११ डिसेंबर रोजी व अपील असलेल्या ठिकाणी दि. १३ डिसेंबर रोजी  दु. ३.३० नंतर होईल. मतदान केंद्राची यादी दि. १३ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. मतदान दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान आणि मतमोजणी दि. १८ डिसेंबरला सकाळी १० वा. पासून होईल. निवडून आलेल्या सदस्यांचे नाव २१ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत सदर क्षेत्रात आचारसंहिता अंमलात राहील.

0000

येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

 






येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

 

             अमरावती, दि. 27 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमाअंतर्गत दि. 9 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत प्रयेक मतदार संघात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदार व नागरिकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

 

            मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात माहिती देण्यासाठी महसुल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशिक्षण व विकास प्रबोधिनीचे संचालक तथा समन्वय अधिकारी अजय लहाने, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, निवडणूक नायब तहसीलदार प्रविण देशमुख तसेच पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.

 

            जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत मतदार नोंदणी, अद्यावतीकरण व शुद्धीकरण करण्यात येत आहे.   18 वर्षे पूर्ण झालेले नवमतदार तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यत पोहोचून मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. मोहिमेंतर्गत  रविवार दि. 26 नोव्हेंबर, शनिवार दि. 2 डिसेंबर व रविवार दि. 3 डिसेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 

            प्रारूप यादीत आपल्या नावाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. यासाठी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील अचूक आहे का, याची खात्री करणे आवश्यक असून या मोहिम कालावधीत मतदारांनी नाव नोंदणी व दुरुस्त्या करुन घ्यावे. विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करण्यात येते आहे. त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबधी हरकतही तसेच मतदार यादीत दिलेल्या पत्यावर राहत नसेल, तर अशा नावाबाबत त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतात. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाईल. प्रत्येक बीएलओ यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे. मतदार नोंदणीकरीता विविध माध्यमाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त भटक्या जमाती, सेस्कवर्कर, थर्ड जेन्डर, दिव्यांग मतदारांसाठी तसेच नवमतदारांसाठी आतापर्यंत 148 शिबिरे आयोजित करण्यात येऊन त्यामध्ये 5 हजार 585 फॉर्म गोळा करुन मतदार नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिली.

 

            दि. 5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरूष मतदारसंख्या 12 लक्ष 38 हजार 044, स्त्री मतदार संख्या 11 लक्ष 62 हजार 536 व तृतीयपंथी 82, सर्व्हिस व्होटर 3 हजार 289 असे एकुण 24 लक्ष 662 होती. तर दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरूष मतदार संख्या 12 लक्ष 33 हजार 378 आहे. स्त्री मतदारांची संख्या 11 लक्ष 59 हजार 157 तर तृतीयपंथी 82, सर्व्हिस व्होटर 3 हजार 289 असे एकूण मतदार संख्या 23 लक्ष 92 हजार 617 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 664 मतदान केंद्रे आहेत.

 

           नवमतदार व ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी. यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in व ceo.maharashtra.gov.in चा वापर करावा किंवा जवळचे मतदान केंद्रावर बीएलओकडे जाऊन नमुना 6 चा अर्ज भरावा किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले आहे.

00000

Friday, November 24, 2023

‘मिट द प्रेस’: अमरावती श्रमिक पत्रकार संघटनेला पालकमंत्र्यांची भेट

 





‘मिट द प्रेस’: अमरावती श्रमिक पत्रकार संघटनेला पालकमंत्र्यांची भेट

अमरावती, दि. 24 (जिमाका): राजापेठ येथील अमरावती श्रमिक पत्रकार भवनाला उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी श्रमिक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय, पत्रकार संघाचे मार्गदर्शक विलास मराठे, उपाध्यक्ष अमोल इंगोले, कोषाध्यक्ष तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गिरीश शेरेकर, सचिव रवींद्र लाखोडे, कार्यकारिणी सदस्य कृष्णा लोखंडे, प्रवीण कपिले आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

0000


पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ अधिसभा सभागृहाचा नामकरण सोहळा संपन्न



 

पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते

विद्यापीठ अधिसभा सभागृहाचा नामकरण सोहळा संपन्न

अमरावती, दि. 24 (जिमाका) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा सभागृहाचे ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह’ असे नामकरण उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रशस्त वातानुकुलित हॉल, अद्ययावत साऊंड सिस्टीम, बैठक व्यवस्था तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह आहे.  अधिसभा सभागृहाला भारताचे कृषीमंत्री, शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचविणारे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव विद्यापीठ अधिसभेत सदस्य डॉ. रविंद्र मुंद्रे यांनी मांडला होता.  त्यांचा ठराव सर्वानुमते सभागृहाने मान्य केला. 

000000

स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

 






स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित

पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

 

अमरावती, दि. 24 (जिमाका) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाचे विमोचन उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

 

            संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाचा विमोचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड तसेच विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या पत्नी श्रीमती दिपाली मालखेडे, ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाचे लेखक डॉ. मनीष गवई, दिनेश सुर्यवंशी तसेच विद्यापीठाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

 

पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे हे विद्यार्थी केंद्री धोरण राबविणारे कुलगुरु तसेच उत्कृष्ट प्रशासक होते. विद्यापीठामध्ये काम करताना अल्पावधीत विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय बनले. त्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे प्राध्यापकांसह विद्यार्थीही प्रभावित झाले होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे एक अभ्यासू, दूरदृष्टी असणारा मार्गदर्शक तसेच शिस्तप्रिय व्यक्ती हरपला. त्यांनी केलेले कार्य पुढील पिढीला मार्गदशक ठरावे यासाठी त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकामध्ये स्मृती स्वरुपात जतन करण्यात आले आहे. या पुस्तकांच्या रुपाने त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, असेही ते यावेळी म्हणाले.

 

पुस्तकाचे लेखक डॉ. मनीष गवई यांनी यावेळी ‘ध्येयवेडा कुलगुरु’ या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली. स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या पत्नी श्रीमती दिपाली मालखेडे यांनी यावेळी त्यांच्या सहवासात घालविलेल्या स्मृतींना उजाळा दिला.

000000



विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 







विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा

- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

अमरावती, दि.24(जिमाका) : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम राबवित आहे. या मोहिमेंतर्गत शासनाच्या योजनेची माहिती देणारे प्रसिद्धीरथाचे बोरगाव धर्माळे येथून उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी शुभारंभ केला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करावी. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

 

अमरावती तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून 'विकसित भारत संकल्प यात्रे'स प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, तहसीलदार विजय लोखंडे, सरपंच  श्रीमती जोशीला राऊत, ग्रामसेवक मनीष इंगोले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी लाभार्थ्यांना पालकमंत्री यांचे हस्ते आयुष्यमान भारत गोल्ड कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच गावाला शंभर टक्के ‘हर घर जल’ घोषित झाल्याबाबत प्रमाणपत्र देऊन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांचे माहिती  देणारे स्टॉल लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. मा.पंतप्रधान यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश सर्व मान्यवर व नागरिकांनी ऐकला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.

 

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती असलेले चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद क्षेत्र आणि विविध ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे. नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

00000



DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...