सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 15 ऑगस्टपर्यंत
सामाजिक न्याय विभागाच्या विविध
पुरस्कारासाठी
अर्ज सादर करण्याची मुदत 15 ऑगस्टपर्यंत
अमरावती, दि.
4 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यामार्फत समाज कल्याण क्षेत्रात
कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, व्यक्ती
यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20,
2020-21,2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्दश्री कर्मवीर
दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज
मागविण्यात येत आहेत.
यापूर्वी अर्जदार,
संस्था ज्यांनी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वित्तीय वर्षासाठी अर्ज केला आहे,
त्यांना नव्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ज्या वर्षासाठी
अर्ज केला आहे, त्या वर्षासाठी चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. या कालावधीसाठी
पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या वर्षासाठी
व ज्या पुरस्कारासाठी अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्कारासाठी विहित
केलेल्या अटींची पुर्तता करणे आवश्यक राहील. समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
करणाऱ्या इच्छुकांनी या पुरस्कारासाठी दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज आवश्यक कागदपत्रासह
सादर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे व समाज कल्याण विभागाचे
आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
या
विविध पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभाग https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी
जिल्ह्याचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन चांदुर रेल्वे, रोड
अमरावती या ठिकाणी संपर्क साधून दि. 15 ऑगष्ट 2023 पर्यंत विहित नमुन्यातील परीपूर्ण
अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment