महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र
स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात शैक्षणिक संस्था
व विद्यार्थ्यांनी
सहभागी होण्याचे आवाहन
अमरावती, दि. 7 (जिमाका) : राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या
नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या कौशल्य,
रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’चे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ www.mssins.in अथवा स्टुडंट
इनोव्हेशन चॅलेंजच्या www.schemes.msins.in या भेट देण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
या उपक्रमाचे अनावरण 15 जुलै 2023 रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व
नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आले. राज्यातील
सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी नवउद्योजक व त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन
त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ
मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे हे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या
उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या उपक्रमात सहभागीय होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा
औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी
किंवा जास्तीत जास्त तीन विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थी,
विद्यार्थिनी, समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. या उपक्रमाच्या नोंदणीसाठी
शैक्षणिक संस्था 15 ऑगस्टपर्यंत आणि उमेदवार त्यांच्या संबंधित संस्थेच्या नावाखाली
31 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये करुन शकतील.
हा उपक्रम तीन टप्प्यात आयोजित करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात राज्यातील
महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येते.
त्यानंतर त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे
अर्ज करु शकतील. संस्थांस्तरावर उत्तम दोन संकल्पानांची निवडही प्रथम टप्प्यात करण्यात
येईल.
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून
प्राप्त झालेल्या उत्तम संकल्पनांमधून, सर्वोकृष्ट शंभर संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी
निवड करण्यात येईल. निवडलेल्या शंभर नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा
आयोजित करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोकृष्ट दहा विजेते
निडले जातील. सर्वोकृष्ट दहा विजेत्यांमध्ये 30 टक्के महिला, 50 टक्के औद्योगिक प्रशिक्षण
संस्थांचे विद्यार्थी व वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट (ओडीओपी) संबंधित नवसंकल्पनांना
प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचे बील भांडवल देण्यात
येणार आहे. इच्छुकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment