Wednesday, January 31, 2018

महालक्ष्मी मंदिर परिसराच्या 80 कोटींच्या
विकास आराखड्यास मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 31 : कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे 80 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली. विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीनही वाहनतळावर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.
येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीस महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलगृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकरनगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटीलखासदार धनंजय महाडिकआमदार अमल महाडीकराजेश क्षीरसागरमाजी मंत्री आमदार सतेज पाटीलमहापौर स्वाती येवलुजेमुख्य सचिव सुमित मलिक,सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंहजिल्हाधिकारी अविनाश सुभेदारमहापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरीपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेबिंदू चौक वाहनतळ ते मंदिर परिसर या पादचारी मार्गावर इलेक्ट्रिकल वाहने वापरण्यात यावीत. तसेच भक्त निवासामध्ये सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठी सोय करावी. तसेच मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्तीसाठी विशेष यंत्रणा उभारण्यात यावी. जेणेकरून हा परिसर स्वच्छ राहिल. तसेच निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे तेथेच विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यात यावी.
विकास आराखड्यातील कामांवर सनियंत्रणासाठी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महानगपालिका आयुक्त श्री. चौधरी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. हा परिसर विकास आराखडा 80 कोटीं आहे. यामध्ये मंदिर परिसरात सुमारे साडेबाराशे भाविक क्षमतेचे दर्शन मंडप (8.73 कोटी) उभारण्यात येणार असून त्यामध्ये शौचालयपिण्याचे पाणीपादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आदी असणार आहे. व्हिनस कॉर्नरजवळ 8500 चौ.मी. क्षेत्रावर भक्त निवास (21.48 कोटी) उभारण्याचे प्रस्तावित असून यामध्ये 138 खोल्या, 10 सूट, 18 हॉल (डॉरमेटरी) असणार आहेत. तसेच 240 क्षमतेचे बहुमजली वाहनतळ (11.03 कोटी)डायनिंग हॉलसमुदाय,दुकाने आदींचाही समावेश यामध्ये आहेत. बिंदु चौक (4.89 कोटी) येथे 4841 चौ.मी बहुमजली वाहनतळ उभारण्यात येमार असून यामध्ये 170 चारचाकी व 315 दुचाकी पार्क करण्याची याची क्षमता आहे. तर सरस्वती थिएटर (7.01 कोटी) येथे 2200 चौ.मी. क्षेत्राचे बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून याध्ये 140 चारचाकी व 145 दुचाकी क्षमता आहे. याशिवाय मंदिरा भोवताली पादचारी मार्ग व बिंदू चौक ते भवानी मंडपापर्यंत पादचारी मार्ग (2.65 कोटी)शहरात दिशादर्शक फलक (0.06 कोटी)शौचालयपिण्याचे पाणी आदी सार्वजनिक सुविधा (1.87कोटी)मंदिरच्या आसपास क्षेत्राचे सौंदर्यीकरण (0.94 कोटी)आपत्ती व्यवस्थापन सुविधा (1.60 कोटी)सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी (1.31 कोटी)सेवा वाहिनी स्थलांतर (2.91 कोटी),आरोग्य सुविधा (52 लाख) आदींचा विकास आराखड्यात समावेश आहे.
००००


दिलखुलास कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
         
मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात बीड जिल्ह्याचा विकास या विषयावर ग्रामविकासमहिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
            ही मुलाखत गुरुवार दि. 1 आणि शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रुपलक्ष्मी चौगुले-शिंदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील रेल्वे विकासजलसंधारण प्रकल्परस्ते विकासपर्यटन विकास, जिल्ह्यात राबविण्यात येणारे स्वच्छ भारत अभियानतीर्थक्षेत्र तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत श्रीमती मुंडे यांनी दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
००००
दुर्जनांवर मात करण्यासाठी
सज्जनांनी संघटीत व्हावे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. 31: समाजातील सज्जन शक्ती संघटीत झाल्यासच दुर्जन शक्तींवर सहज मात करता येते आणि सकारात्मक बदल घडतो. म्हणून सज्जन शक्तींनी संघटीत व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथ केले.
            येथील गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात अनुलोम लोकराज्य अभियान (अनुलोम) पुणे विभागाच्यावतीने आयोजित सारथ्य समाजाच्या विकास मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळेपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकआंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंहअपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशीविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवीअनुलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझेसारंगधर निर्मलहर्षल मोर्डेमयुर राजे उपस्थित होते.
           मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेलोकशाहीच्या यंत्रणेला चालविण्यासाठी समाजातील लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असतो. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम होवू शकत नाही. समाजातील सकारात्मक शक्ती जेव्हा सक्रीय होतेत्यावेळी समाजात वेगाने परिवर्तन घडत असते. समाजातील सुप्त सकारात्मक शक्तीला सक्रीय करण्याचे काम अनुलोम ही संस्था करत आहे. ही संस्था पूर्णपणे अराजकीय असल्याने समाजासह शासकीय यंत्रणेलाही ही संस्था जवळची वाटते. समाजात चांगल्या विचाराने समाजाच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या अनेक समाजसेवी संस्था आहेत. या सर्व संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम अनुलोम संस्था करत आहे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात वेगवान पद्धतीने काम करणारी ही संस्था आहे. अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत 20 लाख सामान्य लोकांना जोडून 7 लाख कार्यकर्ते निर्माण करणारी ही संस्था आहे. सामाजिक कार्यकर्ते हेच अनुलोम संस्थेचे शक्तीस्थान आहे.
            कोणतेही लोकोपयोगी काम करताना शासनाचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचा भाव हा सेवेचा असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री पुढे म्हणालेजेव्हा शासकीय अधिकारी सामान्य लोकांना जवळची वाटू लागतातत्याचवेळी समाजाच्या विकासाला आणि परिवर्तनाला सुरूवात होते. सर्व शासकीय योजनांचा आत्मा हा लोकसहभाग हाच आहे. वेगवेगळ्या चौदा शासकीय योजना व विविध विभागांना एकत्र करून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. लोकसहभागासह सामाजिक संस्था व व्यक्तींच्या सकारात्मक सहभागामुळे आज महाराष्ट्र दुष्काळमुक्तीकडे दमदार वाटचाल करत आहे. शास्त्रीय दृष्टीकोन समोर ठेवून शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविले. त्यासाठी जलमित्र ही संकल्पना राबविण्यात आली. या जलमित्रांनी राज्यात जलक्रांती करून दाखवली आहे. सकारात्मकतेचे हे आपल्या समोरील सर्वात मोठे उदाहरहण आहे.
            समाजात परिवर्तन करण्याची शक्ती संघटनेत आहे. त्यामुळे देशासाठीसमाजासाठी काम करणाऱ्या संस्थांनी संघटीत होवून काम करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसात शासनाच्या पुढाकाराने उद्योग क्षेत्रातील सामाजिक दायित्व फंडाच्या माध्यमातून मोठे काम राज्यात उभे राहिले आहे. कोणतेही सकारात्मक काम हे राष्ट्रीय कामच आहे. त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठीउन्नतीसाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रित येवून काम करण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.
             यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकरमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथ,पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमापसमाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकरअहमदनगरचे जिल्हाधिकारी अभय महाजनपीएमआरडीएचे संचालक किरण गित्तेपिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकरअहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळेविभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड यांना अनुलोम सन्मित्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
            या मेळाव्याच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्थासंघटनायुवक मंडळेमहिला बचत गट यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सुमारे दोन हजाराच्या वर  संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोमचे पुणे विभाग प्रमुख अनिल मोहिते यांनी केले. तर आभार रविंद्र दहाड यांनी मानले.







००००

Tuesday, January 30, 2018

चिंतामण वनगा यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
मुंबईदि30 : पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली  आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासींच्या उन्नतीसाठी श्री. वनगा गेली अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत होते.  विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांनी आदिवासी समुदायाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला होता. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या वनगा यांच्या निधनाने एक निस्पृह आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.
भाषासंस्कृतीसण वेगवेगळे तरी भारतीय म्हणून आपण एकसंघ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 29 : भाषासंस्कृतीसण वेगवेगळे असले तरी आपण भारतीय म्हणून एकमेकांवर प्रेम करतो ही आपली एकसंघ राहण्याची ताकद आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
षण्मुखानंद येथे आयोजित तामिळ सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
 कार्यक्रमास आमदार कॅप्टन आर. तमिळसेलव्हन,आमदार आशीष शेलारजयराज साळगावकरअभिनेत्री श्रुती डांगेआदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीगेल्या अनेक वर्षांपासून तमिळ बांधव महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने इथे राहत असून त्यांनी आपली संस्कृती जपली आहे. पण त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रालाही आपले केले आहे. तमिळ भाषा प्राचीन असून आजही या भाषेने आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवत आपल्या सर्वांना समृद्ध केले आहे.
तमिळ भाषा ही एक पुरातन भाषा आहे. थिरुकुरल साहित्याचे माहात्म्य जगाने मान्य केले आहे. या संस्कृतीचा एक इतिहास आहे. आज तामिळने महाराष्ट्रालाच नाही तर देशाला रजनीकांत सारखा सुपरस्टार अभिनेता दिला आहे. भाषासंस्कृतीसण वेगवेगळे असले तरी आपण भारतीय म्हणून एकमेकांवर प्रेम करतो ही आपली एकसंघ राहण्याची ताकद आहे. तामिळकरांच्या या पोंगलच्या निमित्ताने आपली भारतीय संस्कृती अशीच पुढे जावो अशा शुभेच्छाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
कार्यक्रमास मुंबई व परिसरातील तमिळ बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
००००

स्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल
                          आर्थिक सर्वेक्षण पाहणीतील निष्कर्ष      

नवी दिल्ली, 29 :  वस्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. देशाच्या एकूण वस्तू व सेवा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 22.3 टक्के इतका आहे.

देशाचा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2017- 2018 आज प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार वस्तू व सेवा निर्यातीमध्ये देशातील महाराष्ट्र ,गुजरातकर्नाटकतामिळनाडू,तेलंगणा ही पाच राज्य अग्रेसर ठरली आहेत. या पाच राज्यांचा वाटा देशाच्या एकूण निर्यातीपैकी 70.1 टक्के इतका आहे. या पाच राज्यांपैकी महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे 22.3 टक्के इतका आहे. गुजरात राज्य 17.2 टक्के निर्यातीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक 12.7,तिसऱ्या स्थानावरतामिळनाडू 11.5 टक्क्यासह  चौथ्या तर तेलंगणा 6.4 टक्के निर्यातीसह पाचव्या स्थानावर राहिले आहे. 
आंतरराज्य व्यापारात महाराष्ट्र प्रथम
देशातील राज्यांतर्गत व्यापारात महाराष्ट्र,गुजरातहरियाणाओडिशा आणि तामीळनाडू ही राज्य अग्रेसर ठरली आहेत. महाराष्ट्र आंतरराज्य व्यापारात 15.7 टक्के निर्यात तर 13.7 टक्के आयातीसह अव्वल ठरले आहे. 
  जीएसटी नोंदणीत महाराष्ट्र टॉप राज्यात

वस्तू व सेवा कर नोंदणीमध्ये देशातील महाराष्ट्रउत्तर प्रदेश ,तामीळनाडू ही चार राज्य अग्रेसर ठरली आहेत. 

Monday, January 29, 2018

विज्ञान शाखेच्या आदिवासी मुला-मुलींना
पॅरामेडिकल कोर्स शिकविणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·         आदिवासी भागातील सिकलसेल रुग्णांच्या उपचारासाठी आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाने विशेष योजना तयार करावी
·         गडचिरोली जिल्ह्यात अडीच लाख मच्छरदाण्यांच्या वाटपामुळे मलेरियाने होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट
·         नागपूर येथे प्लाझ्मा सेंटर तातडीने सुरु करावे
·         वैद्यकीय कौशल्य विकास अभ्यासक्रम राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातून सुरु करावा

मुंबई, दि. 29 : विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आदिवासी मुला-मुलींना पॅरामेडिकल कोर्सचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून आदिवासी भागात आरोग्याबाबत जनजागृती, समुपदेशन करण्यात येईल. आदिवासी भागातील सिकलसेल रुग्णांच्या उपचारासाठी आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाने विशेष योजना तयार करावी. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत अडीच लाख मच्छरदाण्यांचे वाटप झाल्याने या भागातील मलेरियाने होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
आरोग्य विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, राज्यमंत्री विजय देशमुख, उद्योग राज्यमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यावेळी उपस्थित होते.
राज्यासह विदर्भातील आरोग्य सेवेबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. विदर्भातील सिकलसेलच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केंद्र सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आदिवासी भागातील मुलांमध्ये सिकलसेलचे प्रमाण आढळून येत असून या आजारावरील उपचाराचा खर्च भागविण्यासाठी सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या वतीने विशेष योजना सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यात नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे प्लाझ्मा सेंटर सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. आज झालेल्या बैठकीत नागपूर येथे प्लाझ्मा सेंटर तातडीने सुरु करण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. या सेंटरसाठी केंद्र शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यस्तरावर केईएम येथे तर विभागीय स्तरावर नागपूर येथे विषाणू प्रयोगशाळा सुरु करण्याचा निर्णय झाला असून याबाबत सुरु असलेल्या कार्यवाहीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. नागपूर येथील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ही प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहे.या ठिकाणी आरोग्य तंत्रज्ञान मुल्यांकन केंद्र सुरु करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने नागपूर येथे कॅन्सर इन्स्टीट्यूट सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मानांकन केलेला वैद्यकीय कौशल्य विकास अभ्यासक्रम राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातून शिकविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन त्यामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शासकीय रुग्णालये अधिक सक्षम करण्यासाठी तसेच त्या मधील यंत्रसामुग्रीची वेळीच देखभाल दुरुस्ती करण्याकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी रुग्णालय शुल्काचा वापर करण्याचे अधिकार देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या सेवांना तातडीने प्रशासकीय मंजुरीसाठी नागपूर येथे अतिरिक्त संचालनालय सुरु करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. नागपूर येथे स्पाईन सेंटर, बालआरोग्य संस्था सुरु करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. पुणे व नागपूर येथील मनोरुग्णालयात पदव्युत्तर मनोरुग्ण चिकीत्सा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
सिद्धीविनायक ट्रस्टमार्फत देण्यात आलेल्या देणगीच्या माध्यमातून राज्यात 108 ठिकाणी डायलिसिस सेंटर येत्या दोन महिन्यात सुरु करण्यात येणार असून यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, बीड, सांगली, औरंगाबाद येथे अर्ली डिटेक्शन सेंटर सुरु केले जाणार आहे. अमरावती येथे ट्रामा केअर सेंटर सुरु करतानाच अकोला, यवतमाळ, नागपूर या वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. वैद्यकीय बॉन्डची अंमलबजावणी प्रभावी व पारदर्शकपणे व्हावी याकरिता त्याची कार्यप्रणाली ऑनलाईन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
बैठकीस आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष कार्य अधिकारी (वैद्यकीय) डॉ. आनंद बंग यांच्यासह आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००


शेतकरी सन्मान योजनेसाठी एक लक्ष
रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांनी शेतकरी सन्मान योजनेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द केला.
रामगिरी येथे अल्ताफ हमीद यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश दिला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाळे, आमदार संजय पुराम, विरेंद्र अंजनकर, हेमंत पटले, प्रमोद संगीडकर आदी उपस्थित होते.
००००
मोर्णा स्वच्छता मोहिमेची मा. पंतप्रधानांनी घेतली दखल
मन की बातमध्ये मोर्णा स्वच्छता मोहिमेचे केले कौतुक
एकजुटीने अकोलेकरांनी मोर्णा नदीची केलेली स्वच्छता प्रशंसनीय
    --- पंतप्रधान नरेंद्र मोदी  

अकोला, दि. 28    जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ बनलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेची आज स्वत: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखली घेतली. आपल्या मन की बातया कार्यक्रमातून त्यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले. एखादे चांगले काम करण्याचा ठाम निश्चय केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही, या भावनेतूनच अकोल्याच्या लोकांनी एकजुटीने मोर्णा नदीची केलेली स्वच्छता प्रशंसनीय आहे, याबददल मी अकोल्याच्या जनतेचे, तेथील प्रशासनाचे अभिनंदन करतो, आपला हा उपक्रम देशातील इतर लोकांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल, या शब्दांत पंतप्रधानांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले.
दूरदर्शन, आकाशवाणी आणि इतर प्रसार माध्यमांवरुन मा. पंतप्रधान यांचा मन की बात हा कार्यक्रम प्रसारीत होत असतो. आज रविवारी प्रसारीत झालेल्या त्यांच्या या कार्यक्रमात मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचा उल्लेख आला. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 13 जानेवारी 2018 पासून लोकसहभागातून सुरु झालेल्या या मोहिमेमुळे जलकुंभी व कचऱ्याने भरलेली ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ झाली आहे.
मोर्णा स्वच्छता मोहिमेची दखल पंतप्रधानांनी घेतल्यामुळे अकोलेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आजच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंगेशने नरेंद्र मोदी ॲपवर पाठविलेल्या फोटोकडे माझे लक्ष वेधले गेले. त्या फोटोमध्ये एक नातू आपल्या आजोबांसोबत मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेला दिसत होता. नंतर मला कळले की, अकोल्याचे नागरिक स्वच्छ भारत अभियानातंर्गत मोर्णा नदी स्वच्छता मोहिम राबवित आहेत. पूर्वी मोर्णा नदी बाराही महिने वाहत होती. परंतु आता जलकुंभी व कचऱ्याने ती भरलेली होती.  तिच्या स्वच्छतेसाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. १३ जानेवारी रोजी मोर्णा स्वच्छता मोहिमेतंर्गत नदीच्या चार किलोमीटर क्षेत्रात चौदा ठिकाणांवरून लोकसहभागातून नदीची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात ६ हजारांपेक्षा जास्त नागरिक, शंभरापेक्षा जास्त सामाजिक संस्था, विदयार्थी, मुले, वृध्दांसह प्रत्येकाने भाग घेतला. २०  जानेवारीलाही नदी स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आली. मला सांगण्यात आले की, नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत दर शनिवारी ही मोहिम सुरुच राहणार आहे. यातून असे दिसून येते की, एखादे चांगले काम करण्याचा निश्चिय केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही, लोकसहभागातून मोठे परिवर्तन घडू शकते.  अकोल्याच्या लोकांनी एकजुटीने मोर्णा नदीची केलेली स्वच्छता प्रशंसनीय आहे, याबदृल मी अकोल्याच्या जनतेचे, तसेच तेथील जिल्हा व महानगर पालिका प्रशासनाचे अभिनंदन करतो, आपला हा उपक्रम देशातील इतर लोकांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले अकोलेकरांचे अभिनंदन
मन की बात या कार्यक्रमात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे केलेल्या कौतुकाबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेच्या यशाचे श्रेय अकोलेकरांना दिले आहेजिल्हाधिकारी म्हणाले की, मोर्णा स्वच्छता मोहिमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन मोहिमेचे कौतुक केले आहे. या मोहिमेत सहभागी झाल्याबदृल सर्व अकोलेकरांचे मी अभिनंदन करतो.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, यांच्यासह मोहिमेत सहभागी झालेले  लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, विदयार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, एनएनसीचे विदयार्थी, व्यापारी, पोलीस, महिला, वयोवृध्द नागरिकांनी मोहिमेत सहभाग घेतल्याबदृल जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वांचे अभिनंदन करुन त्यांचे आभार मानले.




DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...