Tuesday, March 31, 2020

सर्वांनी मिळून कोरोना आव्हानाचा यशस्वीपणे मुकाबला करू - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



            मुख्यमंत्री सहायता निधीला पालकमंत्र्यांकडून एक महिन्याचे वेतन 

 अमरावती, दि. 31 :  बाहेरून आलेल्या नागरिकांच्या तपासणी, क्वारंटाईन आदी प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग, महसूल, महापालिका यांची पथके कार्यरत असून, आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जात आहे. या कालावधीत नागरिकांनीही संयम ठेवून दक्षता पाळावी, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे. या काळात मुख्यमंत्री सहायता निधीला एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांसह विविध लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.

बाहेरून येणा-या प्रत्येक नागरिकाची माहिती मिळवून काटेकोर तपासणी व दक्षतेबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात येत आहे. प्रशासनाकडून ठिकठिकाणी पथके सुसज्ज आहेत. या काळात नागरिकांनीही संयम व धैर्य ठेवावे. कुठल्याही अफवेला बळी पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व विविध मंत्री महोदयांसोबत आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. कोरोना विषाणूचे संकट गंभीर असून, राज्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन विविध लोकप्रतिनिधींनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. जिल्ह्यातही विविध क्षेत्रांतून मदतीचे हात पुढे येत आहेत. प्रवासी, स्थलांतरित कामगार, बेघर व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यात निवारा केंद्रे सुरु झाली असून, येणारा खर्च आपत्ती प्रतिसाद निधीतून करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, प्रवासी नागरिकांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, नागरिक पुढे येत आहेत.

या काळात व्यावसायिक, उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनीही  मुख्य

कोविड-१९ च्या संशयित रुग्णांबाबत खाजगी रुग्णालयांनी घ्यावयाची दक्षता




          मुंबई, दि. ३१ : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालये, सुश्रुषा केंद्रांनी कशा प्रकारे कार्यरत रहावे याबाबत राज्य शासनाने एक नियमावली तयार केली आहे. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
१.     अशा खाजगी रुग्णालयांमध्ये संशयित कोविड-१९ रुग्ण आल्यास त्यांनी, इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च या संस्थेने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोविड-१९ च्या उपचार करणाऱ्या शासकीय वा इतर रुग्णालयांमध्ये संबंधित संशयित रुग्णास तत्काळ दाखल करावे.
२.    खाजगी रुग्णालये नजिकच्या कोविड-१९ रुग्णालयाशी संपर्क साधून संबंधित संशयित रुग्णासाठी बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध आहेत का, याची खात्री करुन घेतील. सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत पुरविण्यात आलेल्या, १०८-रुग्णवाहिकेमधून किंवा कोविड-१९ रुग्णवाहिकेमधूनच संबंधित रुग्णाला पाठविण्यात यावे. दोन्ही संचालनालयामार्फत प्रत्येक कोविड-१९ रुग्णालयात, १०८-रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. भारत सरकारने आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार संशयित रुग्णाला पाठविण्यात यावे. नजिकच्या कोविड-१९ रुग्णालयात बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास त्यानंतरच्या नजिकच्या कोविड-१९ रुग्णालयाकडे या रुग्णाला पाठविण्या संदर्भात विचारणा करण्यात यावी.
३.    ज्या खाजगी रुग्णालयात कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार होत नाहीत, त्यांनी त्यांच्या परिसरातील कोविड-१९ च्या रुग्णांचा उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती करुन घेतल्याची खात्री सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी करुन घ्यावी.
४.   सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकांनी कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्यात येणाऱ्या सर्व अशासकीय रुग्णालये / केंद्रांची यादी तयार करावी.
५.   संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांची यादी तयार करावी.
६.    ही यादी सर्व रुग्णालयांकडे पाठविण्यात यावी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर लावण्यात यावी.

0000

जीवनावश्यक वस्तूंचे दर (31 मार्च 2020)




अमरावती, दि. 31 :  संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री होऊ नये, यासाठी अधिकृत दरसूची जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे वेळोवेळी दरसूची जाहीर करण्यात येत आहे.
कुणीही अतिरिक्त व चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करू नये. कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच विविध व्यावसायिक संघटनांकडून अधिकृत माहिती प्राप्त करून अशी सूची वेळोवळी जाहीर करण्यात येणार आहे.
अमरावती किरकोळ व्यापारी असोसिएशनने 31 मार्च 2020 रोजी प्रमाणित केलेले किराणा दर पुढीलप्रमाणे : 
                                                तांदूळ वाण
                                     लुचाई-    30 रू. प्रतिकिलो
                                    एचएमटी- 45 रू. प्रतिकिलो
                                 काली मुँछ (जुना) - 55 रू. प्रतिकिलो
                                  काली मुँछ (नवीन)- 45 रू. प्रतिकिलो                      
                                                गहू
                                    लोकवन – 27 रू. प्रतिकिलो
                                    शरबती   -  30 रू. प्रतिकिलो
                                                साखर
                                    जाडी साखर- 40 रू. प्रतिकिलो
                                    बारीक साखर- 39 रू. प्रतिकिलो
                                                तेल
                                सोयाबीन – 110 रू. प्रतिकिलो
                            शेंगदाणा तेल – 140 रू. प्रतिकिलो (पाकिट)
                                               डाळी
                                                  तूर डाळ  90 रू. किलो
                                                 चणा डाळ  65 रू. किलो
                                                 उडीद डाळ 95 रू. किलो
                                                  मूग डाळ 110 रू. किलो
                                                        मसाले
                                                हळद 160 रू. किलो
                                              मिरची पावडर 200 ते 210 किलो
                                                 मसाला 200 ते 205 रू. किलो
                                    
(घाऊक दर पुढीलप्रमाणे : घाऊक व्यापारी असोसिएशनने जाहीर केलेल्या दरांनुसार, भोला जिरा तांदूळ 26 रू. किलो, रूपाली तांदूळ 35 रू. किलो, लोकवन गहू 25 रू. किलो, शरबती गहू 25 ते 27 रू. किलो, साखर 36 ते 37 रू. किलो,  तूरडाळ- पटका 88 ते 91 रू. किलो, तूर डाळ- सव्वा नंबर 83 ते 85 रू., चणा डाळ-57 ते 60, उडीद डाळ 85 रू. किलो, मूग डाळ 102 रू. किलो, सोयाबीन तेल 101 ते 104 रू. किलो, शेंगदाणा 137 ते 143 रू. किलो, मिरची पावडर 150 ते 155 रू. किलो, हळद 140 रू. किलो, मसाला 140 रू. किलो
 त्याशिवाय शासकीय दूध संकलन केंद्राने दुधाचे घाऊक दर जाहीर केले. त्यात गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर 30 रूपये, म्हशीच्या दुधाचा दर 40 रूपये आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेल्या घाऊक भावानुसार, कांदे 16 रू. प्रतिकिलो, बटाटा 16 ते 20 रू. प्रतिकिलो, टमाटे 12 रू. प्रतिकिलो, लसूण 4 0 रू. प्रतिकिलो, मिरची 24 प्रतिकिलो, वांगी 10 रू. प्रतिकिलो आहेत. हे सर्व घाऊक दर आहेत.) 
                                                            000 


उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 3 महिने विनामूल्य गॅस सिलेंडर


एप्रिल ते जून पर्यंतच्या कालावधीत प्रत्यक्ष लाभ
जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार नागरिकांना मिळणार लाभ
अमरावती, दि. 31 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाव्दारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून या कालावधीत विनामूल्य गॅस रिफील देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार नागरिकांना लाभ मिळणार आहे.
एप्रिल ते जून या कालावधीत गॅस सिलेंडर रिफील करण्यासाठी लागणारा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अग्रिम स्वरुपात जमा करण्यात येत आहे.  
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने विशेष वित्तीय पॅकेजची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करुन या संकटाच्या स्थितीत आपले योगदान दिले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात देशातील विविध तेल कंपन्यांनी घरोघर गॅस सिलेंडर पोहोचविण्यासाठी नियोजन केले आहे. कंपन्यांकडे गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा आहे. त्यानुसार त्यांच्याकडून वेळोवेळी ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जाईल.
ग्राहकांनी घरीच राहावे. त्यांनी गॅस वितरण कंपनीत न येता, त्यांना घरपोच गॅस सिलेंडर पुरविण्यासंबंधीच्या सूचना गॅस कंपन्यांकडून एसएमएस संदेश व सोशल मिडियातून देण्यात येत आहेत. एलपीजी गॅस सिलेंडर हे अत्यावश्यक वस्तूमध्ये मोडत असल्यामुळे संचारबंदीमधून सूट देण्यात आली आहे. ग्राहकांना सुरळीत गॅस सिलेंडरचा पुरवठा व्हावा, यासाठी गॅस वितरक कर्मचारी, गोडाऊन किपर, मॅकेनिक आणि डिलीव्हरी बॉय आदींमार्फत पूर्ण तत्परतेने सेवा पुरविण्यासाठी काम करीत आहेत.
गॅस रिफिल वितरणाचे काम करताना वितरक, वाहतूकदार, कंत्राटदार आणि कर्मचारी आदींचीही सुरक्षितता राखण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. दुर्देवाने कुठलीही आपत्ती घडल्यास गॅस कंपनीच्या सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जीवन सुरक्षेसाठी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद शासनाने केली आहे.  .
नागरिकांनी कोव्हिड- 19 विरुध्दच्या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन गरीबांना व गरजूंना सामाजिकदृष्ट्या मदत करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे

कलावंत दीपाली बाभुळकर यांचा उपक्रम

                    

 बोलक्या बाहुल्यांच्या व्हिडीओद्वारे जनजागृती

अमरावती, दि. 31 : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दक्षतापालनाबाबत बोलक्या बाहुल्यांच्या चित्रफितीद्वारे जनजागृती उपक्रम येथील पपेट शो कलावंत दीपाली बाभुळकर यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे दक्षतापालनाबाबत विविध टिप्स फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच मिळत आहेत.
श्रीमती बाभुळकर यांनी यापूर्वी निवडणूक कालावधीत ‘चिंगी’ या बोलक्या बाहुलीद्वारे जनजागृती केली होती. आता ‘मीनी’ ही नवी बोलकी बाहुली त्यांनी सादर केली असून, तिच्या चित्रफितीद्वारे त्या जनजागृती करत आहेत. आपल्या मार्मिक शैलीतून हसत खेळत आरोग्य शिक्षण देणारी मीनी ही बाहुली आता लोकप्रिय होत आहे. फेसबुक लाईव्ह व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सादर केला जात आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कुटुंबातील सर्वांनी योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांशी हसत खेळत संवाद साधण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला आहे, असे श्रीमती बाभुळकर म्हणाल्या.
श्रीमती बाभुळकर या दुनिया बोलक्या बाहुल्यांची हा उपक्रम गत 18 वर्षांपासून राबवत असून, सुमारे साडेतीनशे शाळांतून त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. शासनाच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षण वारी या उपक्रमात त्यांनी हजारो शिक्षकांना बाहुलीनाट्याचे प्रशिक्षण दिले आहे. शारीरीक शिक्षण या विषयावर भारतात झालेल्या जागतिक परिषदेत 28 देशांच्या प्रतिनिधीसमोर त्यांनी हा कार्यक्रम सादर केला आहे.

Monday, March 30, 2020

प्रवासी, तसेच बेघर नागरिकांसाठी निवास व्यवस्था


अमरावती, दि. 30 : बेघर, भिक्षुक, हातमजुरी करून पोट भरणारा वर्ग, रूग्ण व त्यांचे नातेवाईक, तसेच ज्यांना निवासासाठी स्वत:चे घर नाही अशा व्यक्तींच्या निवास, भोजन आदी व्यवस्था स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने करण्यात आली  आहे. त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
त्यानुसार श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे हरीना फाऊंडेशन व रोटरी क्लब अमरावती यांच्या सहकार्याने व्यवस्था करण्यात आली आहे.  तेथील संपर्क व्यक्ती : श्री. मनोज राठी (मोबाईल क्र. 9422830224) व श्री. सारंग राऊत (9823104555).
त्याचप्रमाणे, ख्रिश्चन अँड मिशनरी अलायन्स, अंबापेठ, राजकमल चौकाजवळ, अमरावती येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील संपर्क व्यक्ती : टी. एस. लव्हाळे (मोबाईल क्र. 9545356263).
निवा-याची व्यवस्था करताना सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                    000 

प्रवासी नागरिक व विस्थापितांना सुविधेसाठी संनियंत्रण अधिका-यांची नियुक्ती


अमरावती, दि. 30 : बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, पाणी, अन्नधान्य व भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय देखभाल या सुविधा देण्यासाठी संनियंत्रण अधिका-यांची नेमणूक करण्यात आहे. त्याबाबत आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
ग्रामीण क्षेत्रासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहायक अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी विकास मीना व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहायक अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना व मनपा उपायुक्त महेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेघर, विस्थापित झालेले कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या निवारागृह, पाणी, अन्नधान्य व भोजनव्यवस्था व वैद्यकीय देखभाल या सुविधांबाबतची कार्यवाही करण्याबाबत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. व्यवस्थेसाठी जि. प., समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग, मनपा समाजकल्याण आदींच्या शासकीय वसतिगृहाचे अधिग्रहण करावे. या वसतिगृहाच्या अधिक्षकांनी वसतिगृहात वीज, पाणी, बिछायत, स्वच्छता, सुरक्षा कर्मचारी, स्वयंपाकी असल्याची खातरजमा करावी. त्याशिवाय, स्वयंसेवी संस्थांद्वारे भोजन आदी व्यवस्थेबाबत आवाहन महापालिका व तहसीलदारांनी करावे. त्याचप्रमाणे, आवश्यक तिथे शिवभोजनच्या निकषांप्रमाणे धान्य निवारागृहात व्यवस्थेची कार्यवाही करावी.
मुख्य कार्यकारी अधिका-यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी समन्वय साधून योग्य कार्यवाही करावी. शासकीय वसतिगृहे अपुरी पडल्यास शासकीय शाळा घेण्यात याव्यात व ही सर्व कार्यवाही करत असताना सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता या बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
                                    000

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर












सुपर स्पेशालीटी रुग्णालयाच्या विलीगीकरण कक्षाची पालकमंत्र्याकडून पाहणी

अमरावती, दि. 30 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्यातरी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. तथापि, सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह विविध ठिकाणी व्हेंटीलेटरसह सुसज्ज कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या विलगीकरण कक्षाची पाहणी आज पालकमंत्र्यांनी केली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी करुन तेथील सुविधांचा आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह इतर फॅकल्टी डॉक्टर्स, विशेष कार्य अधिकारी रणजित भोसले यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत असून जिल्ह्याच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज विलगीकरण कक्ष कार्यानिव्त करण्यात आले आहे. कोरोना विषाणू हा अतिसंसर्गजन्य विषाणू आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव हा गर्दीतून तत्काळ होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्ट‍न्सिंग ठेवून सतर्कता बाळगावी. प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. घराबाहेर पडू नये.
अमरावती जिल्ह्यात सध्यातरी एकही रुग्ण कोरोना पाझिटिव्ह आढळून आलेला नाही. या पंधरवाड्यात जास्तीत जास्त काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. विषाणूचा प्रादुर्भाव हा 14 दिवसांपर्यंत असतो. त्यामुळे सर्वांनी लॉक डाऊनच्या कालावधीत प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. आताचा टप्पा हा सर्वांनी काळजी घेणारा टप्पा आहे. या टप्प्यात आपण जर चुकीचे वागलो तर, इटली सारखी आपली अवस्था व्हायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
बाहेरच्या राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांकडून होणाऱ्या स्थलांतराच्या परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. ज्या तालुक्याच्या ठिकाणी कारागीर, मजूरांचे स्थलांतर आढळून येत आहे, त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून तहसीलदारांकडून स्थलांतरांची निवाऱ्याची भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
00000

जीवनावश्यक वस्तूंचे दर

संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री होऊ नये, यासाठी अधिकृत दरसूची जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे वेळोवेळी दरसूची जाहीर करण्यात येत आहे.
कुणीही अतिरिक्त व चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करू नये. कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच विविध व्यावसायिक संघटनांकडून अधिकृत माहिती प्राप्त करून अशी सूची वेळोवळी जाहीर करण्यात येणार आहे.
अमरावती किरकोळ व्यापारी असोसिएशनने 30 मार्च 2020 रोजी प्रमाणित केलेले किराणा दर पुढीलप्रमाणे : 
                                                तांदूळ वाण
                                     लुचाई-    30 रू. प्रतिकिलो
                                    एचएमटी- 45 रू. प्रतिकिलो
                                 काली मुँछ (जुना) - 55 रू. प्रतिकिलो
                                  काली मुँछ (नवीन)- 45 रू. प्रतिकिलो                      
                                                गहू
                                    लोकवन – 27 रू. प्रतिकिलो
                                    शरबती   -  30 रू. प्रतिकिलो
                                                साखर
                                    जाडी साखर- 40 रू. प्रतिकिलो
                                    बारीक साखर- 39 रू. प्रतिकिलो
                                                तेल
                                सोयाबीन – 110 रू. प्रतिकिलो
                            शेंगदाणा तेल – 140 रू. प्रतिकिलो (पाकिट)
                                               डाळी
                                                  तूर डाळ  90 रू. किलो
                                                 चणा डाळ  65 रू. किलो
                                                 उडीद डाळ 100 रू. किलो
                                                  मूग डाळ 110 रू. किलो
                                                        मसाले
                                                हळद 160 रू. किलो
                                              मिरची पावडर 200 ते 210 किलो
                                                 मसाला 300 ते 350 रू. किलो
                                    
(घाऊक दर पुढीलप्रमाणे : घाऊक व्यापारी असोसिएशनने जाहीर केलेल्या दरांनुसार, भोला जिरा तांदूळ 26 रू. किलो, रूपाली तांदूळ 33 रू. किलो, लोकवन गहू 24 ते 25 रू. किलो, शरबती गहू 25 ते 27 रू. किलो, साखर 35 ते 37 रू. किलो,  तूरडाळ- पटका 88 ते 91 रू. किलो, तूर डाळ- सव्वा नंबर 83 ते 85 रू., चणा डाळ-57 ते 60, उडीद डाळ 85 रू. किलो, मूग डाळ 102 रू. किलो, सोयाबीन तेल 101 ते 104 रू. किलो, शेंगदाणा 137 ते 143 रू. किलो, मिरची पावडर 150 ते 155 रू. किलो, हळद 140 रू. किलो, मसाला 140 रू. किलो
 त्याशिवाय शासकीय दूध संकलन केंद्राने दुधाचे घाऊक दर जाहीर केले. त्यात गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर 30 रूपये, म्हशीच्या दुधाचा दर 40 रूपये आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेल्या घाऊक भावानुसार, कांदे 18 रू. प्रतिकिलो, बटाटा 16 ते 20 रू. प्रतिकिलो, टमाटे 12 रू. प्रतिकिलो, लसूण 40 रू. प्रतिकिलो, मिरची 24 प्रतिकिलो, वांगी 10 रू. प्रतिकिलो आहेत. हे सर्व घाऊक दर आहेत.) 
                                                            000 



घराबाहेर पडू नका, काळजी घ्या - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे आवाहन

  


अमरावती, दि. 30 : अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गबाधित आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. कुठलीही लक्षणे दिसली तर तपासणी करून घ्या. घराबाहेर पडू नका. आरोग्य यंत्रणेच्या सूचनेचे काटेकोर पालन करा. मी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. आपणही घराबाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले आहे.
राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, कुठलीही लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. मला सर्दी, ताप, खोकला झाल्यावर मी तत्काळ तपासणी करून घेतली. रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यात घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. दक्षता म्हणून सर्वांनी आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन करावे. मी स्वत:ला ‘होम क्वारंटाईन’ करून घेतले आहे. सर्वांनी स्वतःची व इतरांचीही काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्यमंत्री महोदयांनी केले आहे.
शासनाकडून कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी. सर्वांनी मिळून या संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करूया, असे आवाहन त्यांनी केले.
                                          000

अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करू - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून किंवा इतरही प्रकारे अफवा पसरविल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही रूग्ण नसतानाही तसे असल्याच्या बातम्या काही खोडसाळ व्यक्ती मुद्दामहून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत. चुकीची माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला आहे.
शासनाकडून वेळोवेळी वस्तुनिष्ठ व अधिकृत माहिती प्रसृत केली जात आहे. एखाद्या व्यक्तीची तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाला नसतानाही तो रूग्ण असल्याचे दर्शवून चुकीची माहिती पसरविण्याचे प्रकार घडत आहेत. काही घटनांमध्ये विशिष्ट व्यक्तींची नावे खोडसाळपणे संशयित रूग्ण म्हणून पसरविण्यासारखे अपप्रकारही घडत आहेत. अशा अफवांमुळे होणारी सामाजिक हानी लक्षात घेता अफवा पसरविणा-याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.   
                                000

‘हा फॉर्म खोटा



‘हा फॉर्म खोटा’ - रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही.नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियावरून व्हायरल कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न,नागरी पुरवठा विभागाचे आवाहन केले आहे.

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...