नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवठ्यासाठी उत्पादक, विक्रेते, वितरकांना संपूर्ण सहकार्य - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


                         

       

अमरावती, दि. 26 : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी विक्रेता व वितरण साखळी, उत्पादक, वाहतूकदार व  त्यांच्या सहाय्यकारी व्यवसायांना नागरिकांना सेवा पुरविण्यात कुठलाही अडथळा येणार नाही, यासाठी प्रशासनाने संपूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे.  जीवनावश्यक वस्तूंवर अतिरिक्त दर आकारू नये. काळा बाजार किंवा अतिरिक्त भावाने विक्री होत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

          कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांच्या अनुषंगाने यंत्रणेचा आढावा त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला व जिल्ह्यातील उत्पादक, विक्रेते, वितरक यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, एमआयडीसी उद्योजक असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्यासह व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जीवनावश्यक वस्तू वितरणात कुठलाही अडथळा येऊ देणार नाही. तथापि, वितरक, विक्रेत्यांनीही अतिरिक्त दर आकारू नयेत. या परिस्थितीत काळा बाजार होत असल्याचे आढळल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. मात्र, तसे घडण्याची वेळच येऊ नये. ही नफा कमावण्याची वेळ नाही.  आपली देश व समाजाप्रतीची जबाबदारी, बांधीलकी सिद्ध करण्याची ही वेळ आहे.  या काळात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, जीवनावश्यक वस्तू उद्योगांना आवश्यक ठरणारे पॅकेजिंग, पॅक प्रिटिंग आदी व्यवसाय सुरू ठेवण्यास व सुरक्षारक्षक आदी आवश्यक सेवांना संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणित करून पासेसचे वाटप करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तू वाहतूकदारांना पोलीसांकडून अडथळे येणार नाहीत. त्याबाबत पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांच्याकडून सुस्पष्ट सूचना दिल्या जात आहेत. मात्र, जीवनावश्यक वस्तू वाहून नेणा-या ट्रक किंवा मालमोटारीवर स्टीकर्स, उत्पादनाचे नाव असणे आवश्यक आहे. ती दक्षता सर्वांनी घ्यावी. प्रशासन यंत्रणेने वेळीच वाहन प्रमाणित करून देणे, पासवाटप करणे ही कामे तातडीने करावीत. गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांनी घरपोच सेवा सुरु करण्यासारखे उपाय अंमलात आणावेत, असेही आवाहन त्यांनी केले.

तालुका स्तरावरील यंत्रणेची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी घेतली.  प्रत्येक तालुक्यात 4 ते 5 विस्तार अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत.  त्यांची यादी सर्वदूर प्रसिद्ध करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. आपण स्वत: जिल्ह्यात काही ठिकाणी जाऊन यंत्रणेचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सज्ज असून, तिच्या बळकटीकरणासाठी पुरेसे व्हेंटिलेटर आदी यंत्रणा मिळविण्यात येत आहे. या कामाला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन होत आहे. या काळात वीजपुरवठा अजिबात खंडित होता कामा नये, असे निर्देश त्यांनी महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले.

 

वाहनचालक व क्लीनर याखेरीज दुसरी व्यक्ती वाहनात असता कामा नये. त्यांच्या जेवणाचे डबे निघतानाच सोबत ठेवावेत जेणेकरून ढाबे बंद असल्याने अडचण येणार नाही. सॅनिटायझर, साबण आदी स्वच्छता साधने ठेवावीत. माल उतरविण्याच्या ठिकाणीही जेवणाची व्यवस्था करता येणे शक्य आहे. अशी काहीही अडचण आल्यास कळवावे, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.  छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्याच्या सीमांवर जीवनावश्यक वस्तू वाहतुकीला अडथळा येणार नाही. संत्रा उत्पादकांना संत्रा वाहतूकीबाबत कुठल्याही चेकपोस्टला कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाला संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

                             जीवनावश्यक वस्तू वाहतुकीसाठी पास

औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी गर्दी टाळण्यासाठी दिवसनिहाय शिफ्टनुसार कर्मचारी बोलवावे. मात्र, कर्मचारी, कामगारांच्या वेतनात कपात करू नये.  भाजीपाला, फळे आदी जीवनावश्यक वस्तूंसाठी मोकळी मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. त्यांचा वापर व्हावा. जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली इतर वस्तू विक्री करू नये.  जीवनावश्यक वस्तू वाहून नेणा-या वाहन प्रशासनाकडून प्रमाणित करण्यात येईल. जिल्ह्यात घाऊक विक्रीची सुमारे 200 प्रतिष्ठाने आहेत. त्यांची यादी सादर करावी. आवश्यक सर्व वाहनांना पास देण्यात येतील. पोल्ट्री व डेअरी उत्पादने यांच्या वाहनांना पशुसंवर्धन अधिका-यांकडून प्रमाणित करून पास देण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

          कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी वाहतुकीची घनता कमी करण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी उद्योगांत शिफ्टचे प्रयोजन आहे. प्रत्येकाला वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंसाठीच्या वाहनांना, व्यक्तींना वेळेत पास दिले जातील. पोलीसांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. कुठेही अडचण आल्यास संपर्क साधावा, असे पोलीस आयुक्त श्री. बाविसकर यांनी

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती