अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 5 किलो विनामुल्य तांदूळ
अमरावती,दि.02 : देशातील कोरोना व्हायरस (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते माहे जुन-2020 या कालावधीसाठी अन्नधान्याच्या नियमित नियतानुसार अन्नधान्याचे वाटप त्या त्या महिन्यात करण्यात येत आहे.
माहे एप्रिल ते माहे जुन-2020 या महिन्याचे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना या लाभार्थ्यांना नियमित धान्य वाटप त्या संबंधित महिन्यात करण्यात येणार आहे. नियमित धान्य वाटप झाल्यानंतर त्याच महिन्यात अंत्योदय अन्नयोजना, प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना या लाभार्थ्यांना 5 किलो प्रती व्यक्ती मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
माहे एप्रिल ते माहे जुन-2020 मध्ये अंत्योदय अन्नयोजनेनुसार 15 किलो गहू, 20 किलो तांदूळ नियमित वाटप होणार असून 5 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत वाटप होणार आहे. प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेंतर्गत 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ नियमित वाटप होणार असून 5 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत वाटप होणार आहे. शेतकरी लाभार्थी योजनेंतर्गत 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ नियमित वाटप होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी कळविले आहे
0000
Comments
Post a Comment